वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

शासनाच्या जाचक अटीमुळे शेतकऱ्यांचे 90% सोयाबीन नियमबाह्य ठरू शकते. वरोरा बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांसाठी असलेल्या आवश्यक सुविधाचा अभाव.

शासनाच्या जाचक अटीमुळे शेतकऱ्यांचे 90% सोयाबीन नियमबाह्य ठरू शकते. 

वरोरा बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांसाठी असलेल्या आवश्यक सुविधाचा अभाव.

वरोरा 24/1/25
चेतन लूतडे 

नाफेडतर्फे विविध संस्थां मार्फत बाजार समिती यार्ड मध्ये सोयाबीनची खरेदी हमीभावाने सुरू करण्यात आली आहे.

शासनाच्या नियमाने सोयाबीन खरेदी करण्यासाठी बऱ्याच  अडचणी आहेत परंतु बाजार समिती आणि शासनाच्या नियमात कमी जास्त बदल करून वरोरा बाजार समितीमध्ये  शेतकऱ्यांचे सोयाबीन 4892रु. हमीभावाने  बाजार समितीमध्ये घेणे सुरू आहे. सोयाबीन चाळणी झाल्यानंतर निकृष्ट दर्जाचे सोयाबीन शेतकऱ्यांना वापस न्यावे लागते. किंवा खाजगी व्यापाऱ्याकडे बेभाव विकावे लागले. 
शेतकऱ्यांना सरकारने 4892हमीभाव  देण्यात आला असून तालुक्यातील 1100 शेतकऱ्यांचे आतापर्यंत सोयाबीन नाफेड द्वारे खरेदी करण्यात आले आहे. परंतु तालुक्यातील 3300 शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी नाफेड कडे नोंदणी केलेली आहे. नाफेड द्वारे सोयाबीन खरेदी करण्याची शेवटची तारीख 31/1/2025 देण्यात आली आहे.

 शासनामार्फत तुर या पिकासाठी नाफेडची खरेदी दोन दिवसात सुरू होणार असून शेतकऱ्यांनी आपले नावे नोंदवावे असे आव्हान कृषी उत्पन्न बाजार समितीने केले आहे.

बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागत असून शेतकऱ्यांच्या शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा नंबर येत पर्यंत बाजार समितीमध्ये तात्काळत उभे राहावे लागत आहे.  

पन्नास किलोच्या सोयाबीन मापावर 800 ग्राम सोयाबीन जास्त घेतले जात असल्याने शेतकरी नाराज आहेत. तसेच मापारी आणि हमाली याचे सुद्धा पैसे वेगळे आकारले जाते. झाडझुड करणारे मजूर सुद्धा शेतकऱ्यांचे सोयाबीन पॉलिथिन मध्ये घेऊन जात आहे. यावर कोणाचा अंकुश दिसत नाही.

शासन नियम 1967 नुसार नाफेड द्वारे पैशाचे वितरण  शेतकऱ्यांना 24 तासाच्या आत करावे असे नियम असताना शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी बराच कालावधी लागत असल्याने शेतकरी हवालदील झाला आहे.

            Happy birthday Balkdas

Comments