1

प्रति  माननीय गटशिक्षण अधिकारी साहेब, पंचायत समिती वरोरा जिल्हा चंद्रपूर. विषय-अंशकालीन निदेशक नेमणूक करताना होत असलेल्या अन्यायाबाबत. अर्जदार- विशाखा विलास गुजर टिळकवाड वरोरा जिल्हा चंद्रपूर, संपर्क ९५७९७३४२२९.  महोदय. मी सौ विशाखा विलास गुजर (लुतडे) राहणार वरोरा. सध्या मी पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आनंदवन येथे सन २०१२ पासून २०१९ पर्यंत अंशकालीन निदेशक पदावर कार्यरत होते. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्फत गुणांकन व मुलाखत प्रक्रियेनंतर दिनांक १९/७/ २०२५ रोजी मला अंशकालीन कला निदेशक पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आले होते. या पदावर माझी मेरिट पद्धतीने निवड करण्यात आली होती.  मात्र एका महिन्याच्या आतच गटशिक्षण अधिकारी यांच्या आदेशान्वये केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्या सहीचे पत्र मला प्राप्त झाले ज्या द्वारे माझी नियुक्ती ७/८/२०२५ पासून रद्द करण्यात आल्याचे लेखी स्वरूपात कळविण्यात आले त्यामुळे मला मानसिक त्रास सहन करावा लागला . मी २०१६ पासून पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आनंदवन शाळेमध्ये कला निदेशक पदावर कार्यरत...

*आरटीई अंतर्गत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू**Ø 27 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन*

*आरटीई अंतर्गत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू*

*Ø 27 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन*

चंद्रपूर, दि. 24 : सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार, दुर्बल व वंचित घटकातील बालकांना स्वयंअर्थसहाय्यीत शाळा, विना अनुदानित शाळा, पोलिस कल्याणकारी शाळा (विना अनुदानित) आणि महानगरपालिका शाळेमध्ये (स्वयंअर्थसहाय्यीत) आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे.  प्रवेश प्रक्रियेंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील 185 पात्र शाळांची नोंदणी पूर्ण झाली आहे. नोंदणी पूर्ण झालेल्या 185 शाळांतील 1527 रिक्त जागांकरीता ऑनलाईन अर्ज 27 जानेवारी 2025 पर्यंत मागविण्यात येत आहे.

इयत्ता 1 ली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर 25 टक्के प्रवेश प्रक्रियेकरीता पालकांनी https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरण्याची प्रक्रिया विहित मुदतीत पूर्ण करावी. तसेच 25 टक्के प्रवेश प्रक्रियेकरीता विचारपूर्वक 10 शाळांची निवड करावी. प्रवेश प्रक्रियेबाबत काही समस्या असल्यास आरटीई पोर्टलवर मदत केंद्राची माहिती देण्यात आलेली आहे. त्यावर संपर्क करून समस्येचे निराकरण करण्यात यावे.

पालकांनी ऑनलाईन अर्ज भरतांना घरचा पत्ता, जन्मदिनांक, उत्पन्नाचा दाखला, अपंगत्वाचा दाखला, जात प्रमाणपत्र आदी अचूक माहिती भरावी. ज्या बालकांनी यापूर्वी आरटीई अतंर्गत प्रवेश घेतला असल्यास सदर बालकाला पुन्हा अर्ज करता येणार नाही. यापुर्वी प्रवेश मिळालेल्या बालकाची चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश घेतल्याचे निदर्शनास आल्यास सदर प्रवेश रद्द करण्यात येईल, असे शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांनी कळविले आहे.

Comments