1

प्रति  माननीय गटशिक्षण अधिकारी साहेब, पंचायत समिती वरोरा जिल्हा चंद्रपूर. विषय-अंशकालीन निदेशक नेमणूक करताना होत असलेल्या अन्यायाबाबत. अर्जदार- विशाखा विलास गुजर टिळकवाड वरोरा जिल्हा चंद्रपूर, संपर्क ९५७९७३४२२९.  महोदय. मी सौ विशाखा विलास गुजर (लुतडे) राहणार वरोरा. सध्या मी पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आनंदवन येथे सन २०१२ पासून २०१९ पर्यंत अंशकालीन निदेशक पदावर कार्यरत होते. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्फत गुणांकन व मुलाखत प्रक्रियेनंतर दिनांक १९/७/ २०२५ रोजी मला अंशकालीन कला निदेशक पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आले होते. या पदावर माझी मेरिट पद्धतीने निवड करण्यात आली होती.  मात्र एका महिन्याच्या आतच गटशिक्षण अधिकारी यांच्या आदेशान्वये केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्या सहीचे पत्र मला प्राप्त झाले ज्या द्वारे माझी नियुक्ती ७/८/२०२५ पासून रद्द करण्यात आल्याचे लेखी स्वरूपात कळविण्यात आले त्यामुळे मला मानसिक त्रास सहन करावा लागला . मी २०१६ पासून पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आनंदवन शाळेमध्ये कला निदेशक पदावर कार्यरत...

*पोस्ट कार्यालयामधून लाडकी बहीण योजनेच्या पैशांचे कमी वाटप :लाभार्थी महिला त्रस्त* *एका दिवसात ५० हजाराच्याच वाटपाचे अधिकार : पोस्ट कार्यालय*

*पोस्ट कार्यालयामधून लाडकी बहीण योजनेच्या पैशांचे कमी वाटप :लाभार्थी महिला त्रस्त*

 *एका दिवसात ५० हजाराच्याच वाटपाचे अधिकार : पोस्ट कार्यालय*

अतुल कोल्हे भद्रावती : 

              पोस्ट कार्यालयामधून शासनाच्या विविध योजनांचे पैसे लाभार्थ्यांनी मागणी केलेल्या पैशांपेक्षा कमी देत असल्याने लाभार्थी त्रस्त आहेत. विशेषत: लाडकी बहिण योजनेत महिला लाभार्थी आहेत. त्यामुळे त्याची झळ महिलांना बसत आहे. 
   अलीकडे शासनाने लाडकी बहीण योजना आणली. प्रत्येक पात्र महिलेला महिना १५०० रुपये देण्यात येत आहे. शासनाच्या सांगण्यानुसार अनेक महिलांनी पोस्ट कार्यालयात आपले खाते काढले. लाभार्थी महिला आपल्या खात्यात आलेले पैसे काढण्याकरीता पोस्ट कार्यालयात गेले असता त्यांनी मागणी केलेले पूर्ण पैसे न देता कमी पैसे दिल्या जात आहे. या पोस्ट ऑफिस मध्ये ग्रामीण भागातील अनेक महिलांनी खाते काढले. त्या सकाळी ९ वाजताच रांगा लावून असतात. पोस्ट कार्यालयास दिवसाला फक्त ५० हजार रुपयांच्या वाटपाचे अधिकार असल्याने अनेक महिलांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. असल्या प्रकाराने लाभार्थी महीला त्रस्त झाल्या आहेत.
    याबाबत पोस्ट खात्याचे प्रभारी अधिकारी गणेश पुलगमवार यांना विचारणा केली असता आम्हाला दिवसाला फक्त ५० हजार रुपयांच्या वाटपाचे अधिकार आहे. त्यामुळे प्रत्येकाला थोडी थोडी रक्कम दिल्या जाते. या व्यतिरिक्त पिक विमा योजना आणि इतर योजनांच्या पैशाचे वाटप याच रकमेतून करावे लागत आहे. वाटपाच्या वाढीव रकमेची आम्ही वरिष्ठअधिकारी कडे मागणी केलेली असल्याचे त्यांनी सांगितले.

Comments