वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

*पोस्ट कार्यालयामधून लाडकी बहीण योजनेच्या पैशांचे कमी वाटप :लाभार्थी महिला त्रस्त* *एका दिवसात ५० हजाराच्याच वाटपाचे अधिकार : पोस्ट कार्यालय*

*पोस्ट कार्यालयामधून लाडकी बहीण योजनेच्या पैशांचे कमी वाटप :लाभार्थी महिला त्रस्त*

 *एका दिवसात ५० हजाराच्याच वाटपाचे अधिकार : पोस्ट कार्यालय*

अतुल कोल्हे भद्रावती : 

              पोस्ट कार्यालयामधून शासनाच्या विविध योजनांचे पैसे लाभार्थ्यांनी मागणी केलेल्या पैशांपेक्षा कमी देत असल्याने लाभार्थी त्रस्त आहेत. विशेषत: लाडकी बहिण योजनेत महिला लाभार्थी आहेत. त्यामुळे त्याची झळ महिलांना बसत आहे. 
   अलीकडे शासनाने लाडकी बहीण योजना आणली. प्रत्येक पात्र महिलेला महिना १५०० रुपये देण्यात येत आहे. शासनाच्या सांगण्यानुसार अनेक महिलांनी पोस्ट कार्यालयात आपले खाते काढले. लाभार्थी महिला आपल्या खात्यात आलेले पैसे काढण्याकरीता पोस्ट कार्यालयात गेले असता त्यांनी मागणी केलेले पूर्ण पैसे न देता कमी पैसे दिल्या जात आहे. या पोस्ट ऑफिस मध्ये ग्रामीण भागातील अनेक महिलांनी खाते काढले. त्या सकाळी ९ वाजताच रांगा लावून असतात. पोस्ट कार्यालयास दिवसाला फक्त ५० हजार रुपयांच्या वाटपाचे अधिकार असल्याने अनेक महिलांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. असल्या प्रकाराने लाभार्थी महीला त्रस्त झाल्या आहेत.
    याबाबत पोस्ट खात्याचे प्रभारी अधिकारी गणेश पुलगमवार यांना विचारणा केली असता आम्हाला दिवसाला फक्त ५० हजार रुपयांच्या वाटपाचे अधिकार आहे. त्यामुळे प्रत्येकाला थोडी थोडी रक्कम दिल्या जाते. या व्यतिरिक्त पिक विमा योजना आणि इतर योजनांच्या पैशाचे वाटप याच रकमेतून करावे लागत आहे. वाटपाच्या वाढीव रकमेची आम्ही वरिष्ठअधिकारी कडे मागणी केलेली असल्याचे त्यांनी सांगितले.

Comments