वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

ज्येष्ठ उद्योगपती, पद्मविभूषण #रतन_टाटा यांना आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

ज्येष्ठ उद्योगपती, पद्मविभूषण #रतन_टाटा यांना आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 

फक्त बातमी 

मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे  यांनी बैठकीत शोकप्रस्ताव मांडला आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला. रतन टाटा यांना #भारतरत्न देण्याची विनंती केंद्र सरकारला करण्याचा प्रस्ताव यावेळी संमत करण्यात आला.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी शोकप्रस्तावात म्हटले की, उद्यमशीलता समाज उभारणीचा प्रभावी मार्ग आहे. नवनवीन उद्योगांची उभारणी देशाला प्रगतीपथावर नेऊ शकते, परंतु त्यासाठी निस्सीम देशप्रेम आणि समाजाप्रती प्रामाणिक कळवळा आवश्यक आहे. रतन टाटा यांनी या गुणांचा आदर्श घालून दिला. उद्योगक्षेत्रातच नव्हे, तर समाजउभारणीच्या कामातही त्यांचे योगदान अपूर्व होते. ते महाराष्ट्राचे सुपुत्र आणि भारताचा अभिमान होते. रतन टाटा यांनी उच्च नैतिक मूल्यांचे पालन करत आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा ठसा उमटवला. त्यांच्या निधनाने देशाचा एक प्रमुख आधारस्तंभ कोसळला आहे, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी शोकप्रस्तावात म्हटले आहे.

Comments