वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

ज्येष्ठ उद्योगपती, पद्मविभूषण #रतन_टाटा यांना आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

ज्येष्ठ उद्योगपती, पद्मविभूषण #रतन_टाटा यांना आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 

फक्त बातमी 

मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे  यांनी बैठकीत शोकप्रस्ताव मांडला आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला. रतन टाटा यांना #भारतरत्न देण्याची विनंती केंद्र सरकारला करण्याचा प्रस्ताव यावेळी संमत करण्यात आला.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी शोकप्रस्तावात म्हटले की, उद्यमशीलता समाज उभारणीचा प्रभावी मार्ग आहे. नवनवीन उद्योगांची उभारणी देशाला प्रगतीपथावर नेऊ शकते, परंतु त्यासाठी निस्सीम देशप्रेम आणि समाजाप्रती प्रामाणिक कळवळा आवश्यक आहे. रतन टाटा यांनी या गुणांचा आदर्श घालून दिला. उद्योगक्षेत्रातच नव्हे, तर समाजउभारणीच्या कामातही त्यांचे योगदान अपूर्व होते. ते महाराष्ट्राचे सुपुत्र आणि भारताचा अभिमान होते. रतन टाटा यांनी उच्च नैतिक मूल्यांचे पालन करत आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा ठसा उमटवला. त्यांच्या निधनाने देशाचा एक प्रमुख आधारस्तंभ कोसळला आहे, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी शोकप्रस्तावात म्हटले आहे.

Comments