1

प्रति  माननीय गटशिक्षण अधिकारी साहेब, पंचायत समिती वरोरा जिल्हा चंद्रपूर. विषय-अंशकालीन निदेशक नेमणूक करताना होत असलेल्या अन्यायाबाबत. अर्जदार- विशाखा विलास गुजर टिळकवाड वरोरा जिल्हा चंद्रपूर, संपर्क ९५७९७३४२२९.  महोदय. मी सौ विशाखा विलास गुजर (लुतडे) राहणार वरोरा. सध्या मी पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आनंदवन येथे सन २०१२ पासून २०१९ पर्यंत अंशकालीन निदेशक पदावर कार्यरत होते. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्फत गुणांकन व मुलाखत प्रक्रियेनंतर दिनांक १९/७/ २०२५ रोजी मला अंशकालीन कला निदेशक पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आले होते. या पदावर माझी मेरिट पद्धतीने निवड करण्यात आली होती.  मात्र एका महिन्याच्या आतच गटशिक्षण अधिकारी यांच्या आदेशान्वये केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्या सहीचे पत्र मला प्राप्त झाले ज्या द्वारे माझी नियुक्ती ७/८/२०२५ पासून रद्द करण्यात आल्याचे लेखी स्वरूपात कळविण्यात आले त्यामुळे मला मानसिक त्रास सहन करावा लागला . मी २०१६ पासून पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आनंदवन शाळेमध्ये कला निदेशक पदावर कार्यरत...

मतदान बूथ केंद्र वाढवण्याची मागणी: दिनेश चोखारे लांबच लांब रांगामुळे होऊ शकतो मतदानावर परिणाम

मतदान बूथ केंद्र वाढवण्याची मागणी: दिनेश चोखारे 
लांबच लांब रांगामुळे होऊ शकतो मतदानावर परिणाम 
 
चंद्रपूर :- 
मागील लोकसभेच्या निवडणुकीत मतदानासाठी लांबच लांब रांगा लागल्याने मतदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. विधानसभा 2024च्या निवडणुकांमध्ये या समस्यांना सामोरे जाण्यासाठीजिल्हा कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे मजी सभापती दिनेश दादापाटील चोखारे यांनी मतदानाचे बूथ केंद्र वाढवण्याची मागणी केली आहे.

चोखारे यांनी आपल्या निवेदनात नमूद केले की, मागील निवडणुकीत अनेक बूथ केंद्रावर वर रात्री 8 वाजेपर्यंत मतदान सुरू ठेवावे लागले. त्यामुळे मतदारांना मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात खूप अडचणी आल्या. या कारणांमुळे मतदानाच्या सरासरीवर परिणाम होतो, ज्यामुळे लोकांचा सहभाग कमी होतो. 

रांगेत वाट पाहण्यात घालवलेला वेळ कमी करण्यासाठी बूथ केंद्र वाढवणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या मते, यामुळे मतदारांना सोयीचा अनुभव मिळेल आणि लोकतंत्रातील त्यांच्या सहभागाला चालना मिळेल. 


मतदान प्रक्रिया अधिक सुकर करण्यासाठी मतदानाचे बूथ केंद्र वाढवण्याची आवश्यकता आहे. हे फक्त मतदारांच्या सोईसाठी नाही, तर लोकशाही प्रक्रियेत सर्वांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी देखील महत्त्वाचे आहे.

Comments