वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

स्मशानात जाण्यासाठी रस्ता देता का रस्ता? केळी वासियांची शासनाला मागणी

स्मशानात जाण्यासाठी रस्ता देता का रस्ता? 
केळी वासियांची शासनाला मागणी 

वरोरा  हरीश केशवानी 
फक्त बातमी 

नागरी - माढेळीजवळील केळी या गावात  गावापासून ते नदी जवळच्या स्मशानात जाण्यासाठी पांदन रस्ताच नाही आहे . पावसाळ्यात या रस्त्यावर गुडघाभर चिखल असतो. या रस्त्यावरून चालणे म्हणजे तारेवरची कसरत,साधं पायी चालणे जिथं कठीण आहे त्या रस्त्यावरून  प्रेत कसं वाहुन नेणार..?असा संतप्त प्रश्न गावकरी करीत आहे. नदीकाठावर श्मशान भुमी असुनही पावसाळ्यात कुठेही जागा पाहुन अंत्यसंस्कार करावा लागतो या पेक्षा जास्त दुःखद काय असू शकते. प्राथमिक गरजा ही पूर्ण करीत नसेल तर प्रशासन कोणत्या कामाचा हा ही प्रश्न गावकरी करीत आहे.आतापर्यंत तिथे  800/900 मीटर रस्ता सुद्धा शासन करुन देवु शकत नाही आहे.
हा रस्ता नदी कडे, स्मशान भूमी कडे व तिथे शेती करीत असणारे सर्व शेतकरी ,गावातील गुरेढोरे चरण्यासाठी चा एकमेव मार्ग असुन शासनाकडे, लोकप्रतिनिधी कडे बरेचदा मागणी करुनही जाणून बुजून दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. ग्रा. पं केळी उखर्डा मार्फत,गावातील प्रतिष्ठीत नागरीका मार्फत ,प्रत्यक्ष लोकप्रतिनिधींना भेटुन सुद्धा 10 वर्ष लोटूनही काहीही उपयोग होत नसेल तर अशी आश्वासने द्यायची कशाला? 
असा संतप्त सवाल गावकरी करत आहेत. 
येत्या 2 महीन्यात या श्मशानभुमी रस्त्या बाबत निर्णय झाला नाही तर येणार्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा विचार गावकरी करीत आहेत. 
गावातील लोकांचा हा अतिशय गंभीर प्रश्न त्वरित सोडवावा अशी मागणी शासन व लोकप्रतिनिधी यांचेकडे राजुभाऊ झापर्डे व समस्त गावकरी करीत आहेत.

Comments