वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

कोळसा वाहतूक ट्रकांमुळे जनसामान्यांचे जीवन विस्कळीत

कोळसा वाहतूक ट्रकांमुळे जनसामान्यांचे जीवन विस्कळीत 

वरोरा 4 aug 2024
चेतन लुतडे 

एकोणा कोळसाखदान सुरू झाल्यापासून वरोरा आणि लगतच्या गावामधील जनजीवन विस्कळीत झाले असून शासन निर्णयानुसार कामे होत नसल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.

कोळसा खदानीतून निघालेले ट्रक वरोरा शहराच्या मध्यभागातून नेहमी जात असतात. यापूर्वीही भव्य आंदोलन केल्यामुळे रहदारी बंद करण्यात आली होती. यावर उपाययोजना म्हणून उपविभागीय कार्यालय वरोरा इथून लिखित आश्वासन देत हि रहदारी बंद करण्यात आली होती. व तात्पुरता बायपास रोड एमआयडीसी येथून देण्यात आला होता.  माढेळी नाका चौक व रत्नमाला चौक येथे या आदेशाचे फलक संबंधित विभागाकडून लावण्यात आले. परंतु या आदेशाला केराची  टोपली दाखवत काही दिवसातच ही वाहतूक पुन्हा पूर्वत सुरू झाली. मात्र यावेळेस प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांना हाताशी घेत कोळसा व्यापाऱ्यांनी आपला डाव साधत कोळसा वाहतूक राजरोसपणे सुरू केली. या ठिकाणावरून नेहमी  आरटीओ ची गाडी  फिरत असते मात्र यांचे पण दुर्लक्ष होत आहे. बऱ्याचदा कारवाईच्या नावावर ट्रक पकडून त्यावर तात्पुरता फाईन लाऊन सोडल्या जातो. आणि पुन्हा वाहतूक शहराच्या मध्यभागातून सुरू होते. हा प्रकार गेल्या अनेक वर्षापासून असाच सुरू आहे.
त्यामुळे या परिसरातील नागरिक त्रस्त असून . रात्रीच्या वेळेस हे ट्रक मोठ्याने आवाज करीत रहदारी करत असल्याने सर्वसामान्य जनतेला झोपणे अवघड झाले आहे. घरांच्या भिंतीना भेगा पडल्या आहेत. रस्त्याची दुरावस्था झाली आहे. प्रदूषणाचे प्रमाण वाढले. येण्या जाण्यासाठी नागरिकांना अडचणी निर्माण झालेल्या आहे. बरेच निवेदन प्रशासनाला दिले आहेत मात्र आता क्रांती करावी लागेल असा इशाराही नागरिकांनी बोलून दाखवला.

त्यामुळे येत्या सात दिवसात प्रशासना ने ही वाहतूक बंद न केल्यास नागरिकांनी जन आंदोलन उभारण्याचा इशारा  वरिष्ठ प्रशासनाला दिला आहे.

Comments