वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

Rte कायद्या अंतर्गत विद्यार्थ्यांचे प्रवेश शाळेने नाकारल्याने पालक संतप्त. धार्मिक अल्पसंख्यांक शाळा मान्यता असल्याचा दाखला देत प्रवेश नाकारला.

Rte कायद्या अंतर्गत विद्यार्थ्यांचे प्रवेश शाळेने नाकारल्याने पालक संतप्त

धार्मिक अल्पसंख्यांक शाळा मान्यता असल्याचा दाखला देत प्रवेश नाकारला. 

वरोरा 30/7/2024
चेतन लुतडे 

 वरोरा तालुक्यातील संस्कार भारती पब्लिक स्कूल या शाळेने आरटीई अंतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश नाकारल्याने पालक संतप्त झाले आहे 31 तारीख शेवटची असल्याने गटशिक्षण अधिकाऱ्याला निवेदन देण्यात आले.
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात आरटीई अंतर्गत महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या लॉटरी पद्धतीने विद्यार्थ्यांचा आरटीई अंतर्गत येणाऱ्या इंग्रजी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरू आहे. महाराष्ट्र शासनाने वरोरा शहरातील दहा विद्यार्थ्यांची निवड लॉटरी पद्धतीने केली . यामध्ये शहरातील आरटीई अंतर्गत येणाऱ्या तीन शाळाचा निवड विद्यार्थ्यांनी केला होता. त्यामध्ये संस्कार भारती ही शाळा पोर्टल मध्ये असल्याने विद्यार्थ्यांनी ती निवडली होती. यानंतर विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची चाळणी करून प्रवेश प्रक्रिया देण्याचे ठरले होते. मात्र गेल्या आठवड्याभरापासून  पालक विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी शाळेमध्ये रोज जात आहे. शाळेमध्ये वेगवेगळे कारणे सांगून टोलवाटोलवीचे उत्तरे शाळेने दिल्याने शेवटी पालक वैतागले. यानंतर सर्व पालक वर्गाने  शिक्षण अधिकारीच्या दालनात तक्रार देत आपला विरोध दर्शविला. शाळा समितीने आपले निवेदन सुद्धा गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले. विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी एकच दिवस उरला असून 31 जुलै ही शेवटची तारीख असल्याने मुलांच्या प्रवेशाविषयी पालक चिंतित झाले आहे. 
संस्कार भारती शाळेला विचारणा केली असता ही शाळा धार्मिक अल्पसंख्यांक अंतर्गत येत असल्याने आर टी ई विद्यार्थीना प्रवेश नाकारला असल्याचे मत शाळेने कळवले. ही अल्पसंख्यांक शाळा असली तरी अल्संपसंख्यांक विद्यार्थी मात्र या शाळेत किती आहे याचाही प्रश्न पडला आहे. आणि जर नसेल तर मात्र शिक्षण अधिकारी काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.

त्यामुळे पहिलेच उशीर झालेल्या प्रवेशाबद्दल शिक्षण अधिकारी  काय निर्णय घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



Comments