1

प्रति  माननीय गटशिक्षण अधिकारी साहेब, पंचायत समिती वरोरा जिल्हा चंद्रपूर. विषय-अंशकालीन निदेशक नेमणूक करताना होत असलेल्या अन्यायाबाबत. अर्जदार- विशाखा विलास गुजर टिळकवाड वरोरा जिल्हा चंद्रपूर, संपर्क ९५७९७३४२२९.  महोदय. मी सौ विशाखा विलास गुजर (लुतडे) राहणार वरोरा. सध्या मी पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आनंदवन येथे सन २०१२ पासून २०१९ पर्यंत अंशकालीन निदेशक पदावर कार्यरत होते. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्फत गुणांकन व मुलाखत प्रक्रियेनंतर दिनांक १९/७/ २०२५ रोजी मला अंशकालीन कला निदेशक पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आले होते. या पदावर माझी मेरिट पद्धतीने निवड करण्यात आली होती.  मात्र एका महिन्याच्या आतच गटशिक्षण अधिकारी यांच्या आदेशान्वये केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्या सहीचे पत्र मला प्राप्त झाले ज्या द्वारे माझी नियुक्ती ७/८/२०२५ पासून रद्द करण्यात आल्याचे लेखी स्वरूपात कळविण्यात आले त्यामुळे मला मानसिक त्रास सहन करावा लागला . मी २०१६ पासून पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आनंदवन शाळेमध्ये कला निदेशक पदावर कार्यरत...

खापरी येथील रस्ते व नाल्यांची दुरअवस्था**वार्डवासीयांची नवीनिकरण करण्याची मागणी : न. प. मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन*

*खापरी येथील रस्ते व नाल्यांची दुरअवस्था*

*वार्डवासीयांची नवीनिकरण करण्याची मागणी : न. प. मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन*
 
अतुल कोल्हे भद्रावती :-
            शहरातील खापरी वार्ड ते महामार्गापर्यंत असलेला कच्चा रस्ता पावसाळ्याच्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी खराब झाला असून या रस्त्यावर चिखल व पाणी साचून असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या भागात केपीसीएल कंपनी द्वारा वसाहत जवळील खोदण्यात आलेल्या नालीमुळे पावसाचे पाणी या नाल्यात जात असुन वार्डात व नागरिकांच्या घरात शिरत आहे. याचा कमालीचा त्रास वार्डातील नागरिकांना होत आहे. या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन हा रस्ता नव्याने बनवून पाणी जाण्यासाठी योग्य नाली तयार करावी अशी मागणी खापरी वार्डतील नागरिकांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी यांना सादर केलेल्या निवेदनातून केली आहे. वार्डात पावसाच्या पाण्याची योग्य प्रकारे विल्हेवाट होत नसल्याने या रस्त्यावर व वार्डातील सखल भागात पाणी साचलेले आहे. रस्त्यावरही घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. पावसाच्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी हा रस्ता खराब झालेला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहन चालविणे व पायी चालणे सुद्धा जिकरीचे झाले आहे. त्यामुळे खापरी वार्ड तसेच मल्हारी बाबा सोसायटीतील नागरिकांना व शाळेच्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास सोसावा लागत असल्याचे निवेदनातून म्हटले आहे. हे निवेदन सादर करताना खापरी वार्डातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Comments