वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

लघु पाटबंधारे विभाग भटाळा तलाव फुटण्याच्या मार्गांवर संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज

लघु पाटबंधारे विभाग भटाळा तलाव फुटण्याच्या मार्गांवर 

संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज 

वरोरा
चेतन लुतडे 

 वरोरा तालुक्यातील लघु पाटबंधारे विभाग चंद्रपूर शाखा वरोरा यांच्यावतीने कोटबाळा भटाळा, खेमजई या तिन्ही गावच्या मधोमध लघु पाटबंधारे विभाग भटाळा नावाने  40 वर्षा अगोदर तलाव बांधण्यात आले आहे.
 या तलावाची अजून पर्यंत कुठलीच दुरुस्ती करण्यात आली नसल्याने  तलावाचे बांधकाम पूर्णपणे जीर्ण झाले आहे.
 सततच्या पावसामुळे या ठिकाणी भोगदा पडला असून बराच पाण्याचा विसर्ग यामधून होत आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास लवकरच जीर्ण झालेली जमिन फुटण्याच्या मार्गावर आहे, या तलावात गेट नसून, फॉल आहे फॉलची भिंत कोसळली असून  संबंधित अधिकारी यांनी या तलावाची पाहणी करून डाकडुजी करण्याचा प्रयत्न करत आहे,
 

लघु पाटबंधारे विभाग यांनी तयार केलेल्या तलाव दुरुस्ती साठी ग्रामपंचायत भटाळा तसेच सामाजिक कार्यकर्ते यांच्या कडून वारंवार तक्रारी दिल्या मात्र अधिकारी उदासीन असल्यामुळे आज शेतकरी यांना मोठा फटका बसण्याची वेळ आली आहे,तसेच तलाव फुटल्यास शेतपिकाची झालेली नुस्कान भरपाई सिंचन विभागाने दयावी आणि तलावाच्या पाण्याखाली येणाऱ्या रब्बी पीक सिंचाई शेतकरी यांना कामचुकार अधिकारी यांच्या वेतानातून देणात यावी अन्यथा आंदोलन करू असा इशारा शेतकर्यांनी दिला आहे . कोटबाळा, भटाळा, आसाळा, बोरगाव देश या गावातील शेतकरी यांना मोठा फटका बसेल अशी सामाजिक कार्यकर्ते श्री किशोर  डुकरे यांनी वर्तवली आहे.

Comments