1

प्रति  माननीय गटशिक्षण अधिकारी साहेब, पंचायत समिती वरोरा जिल्हा चंद्रपूर. विषय-अंशकालीन निदेशक नेमणूक करताना होत असलेल्या अन्यायाबाबत. अर्जदार- विशाखा विलास गुजर टिळकवाड वरोरा जिल्हा चंद्रपूर, संपर्क ९५७९७३४२२९.  महोदय. मी सौ विशाखा विलास गुजर (लुतडे) राहणार वरोरा. सध्या मी पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आनंदवन येथे सन २०१२ पासून २०१९ पर्यंत अंशकालीन निदेशक पदावर कार्यरत होते. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्फत गुणांकन व मुलाखत प्रक्रियेनंतर दिनांक १९/७/ २०२५ रोजी मला अंशकालीन कला निदेशक पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आले होते. या पदावर माझी मेरिट पद्धतीने निवड करण्यात आली होती.  मात्र एका महिन्याच्या आतच गटशिक्षण अधिकारी यांच्या आदेशान्वये केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्या सहीचे पत्र मला प्राप्त झाले ज्या द्वारे माझी नियुक्ती ७/८/२०२५ पासून रद्द करण्यात आल्याचे लेखी स्वरूपात कळविण्यात आले त्यामुळे मला मानसिक त्रास सहन करावा लागला . मी २०१६ पासून पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आनंदवन शाळेमध्ये कला निदेशक पदावर कार्यरत...

लघु पाटबंधारे विभाग भटाळा तलाव फुटण्याच्या मार्गांवर संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज

लघु पाटबंधारे विभाग भटाळा तलाव फुटण्याच्या मार्गांवर 

संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज 

वरोरा
चेतन लुतडे 

 वरोरा तालुक्यातील लघु पाटबंधारे विभाग चंद्रपूर शाखा वरोरा यांच्यावतीने कोटबाळा भटाळा, खेमजई या तिन्ही गावच्या मधोमध लघु पाटबंधारे विभाग भटाळा नावाने  40 वर्षा अगोदर तलाव बांधण्यात आले आहे.
 या तलावाची अजून पर्यंत कुठलीच दुरुस्ती करण्यात आली नसल्याने  तलावाचे बांधकाम पूर्णपणे जीर्ण झाले आहे.
 सततच्या पावसामुळे या ठिकाणी भोगदा पडला असून बराच पाण्याचा विसर्ग यामधून होत आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास लवकरच जीर्ण झालेली जमिन फुटण्याच्या मार्गावर आहे, या तलावात गेट नसून, फॉल आहे फॉलची भिंत कोसळली असून  संबंधित अधिकारी यांनी या तलावाची पाहणी करून डाकडुजी करण्याचा प्रयत्न करत आहे,
 

लघु पाटबंधारे विभाग यांनी तयार केलेल्या तलाव दुरुस्ती साठी ग्रामपंचायत भटाळा तसेच सामाजिक कार्यकर्ते यांच्या कडून वारंवार तक्रारी दिल्या मात्र अधिकारी उदासीन असल्यामुळे आज शेतकरी यांना मोठा फटका बसण्याची वेळ आली आहे,तसेच तलाव फुटल्यास शेतपिकाची झालेली नुस्कान भरपाई सिंचन विभागाने दयावी आणि तलावाच्या पाण्याखाली येणाऱ्या रब्बी पीक सिंचाई शेतकरी यांना कामचुकार अधिकारी यांच्या वेतानातून देणात यावी अन्यथा आंदोलन करू असा इशारा शेतकर्यांनी दिला आहे . कोटबाळा, भटाळा, आसाळा, बोरगाव देश या गावातील शेतकरी यांना मोठा फटका बसेल अशी सामाजिक कार्यकर्ते श्री किशोर  डुकरे यांनी वर्तवली आहे.

Comments