वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

साखरा -आब वडगाव कोरा पोच मार्गावरील अनेक गावाचा संपर्क तुटला

साखरा -आब वडगाव कोरा पोच मार्गावरील अनेक  गावाचा संपर्क तुटला

वरोरा 
  दिनांक १९/७/२०२४ ला झालेल्या मुसळधार पावसा मुळे मौजा साखरा येथील मार्गांवरील पुलाचे काम अर्धवट काम केले अल्यामुळे पुल वाहुन गेला सदर रहदारी साठी नागरिकांना सर्घष करावा लागत आहे.

      वरोरा तालुक्यातील साखरा -आब वडगाव ते कोरा जाणाऱ्या मार्गांवर पुलाचे काम संबंधित ठेकेदाराने वेळेवर पूर्ण न केल्यामुळे तसेच पी डब्लू. डी. ची निष्काळजीपणा मुळे पुलाचे काम अर्धवट राहिले आहे.नागरिकांना जाण्यासाठी रस्ताच नसल्यामुले पुलाला लागून असलेल्या सीडी वरुन पूल पार करून शेतकऱ्यांना आपल्या शेतात जावे लागत आहे . मुसळधार पाऊस येत आहे परंतु जाणे येणेसाठी अर्धवट पूल अड्सर ठरला आहे. यामध्ये पि डब्लू डी आणि ठेकेदार जबाबदार असल्याचा आरोप साखरा ग्रा. प. चे माजी सरपंच दिनेश मोहारे यांनी केला आहे.

 ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्था नसते त्यामुळे साखरा, आब वडगाव येथील नागरिकांना शेगाव,वरोरा, चंद्रपूर या ठिकाणी उपचारासाठी  तसेच जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी सुद्धा जावे लागते तसेच शाळेच्या मुलाना शाळेत जान्या करीता कोनताही पर्याय नसल्या मुळे शिक्षण बंद झाले आहे. अनेक गावांना रहदारीसाठी जोडणारा रस्त्यावरील पुलाचे काम ठेकेदाराने निर्धारित वेळेत पूर्ण न करता अर्धवट बांधकाम केले आहे. त्यामुले नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वरिष्ठ प्रशासनाने या गंभीर समस्याकडे लक्ष देऊन उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिक गावकऱ्यांनी केली आहे .

Comments