वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

अतिवृष्टीमुळे शेत पिकाचे नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजारांची नुकसान भरपाईची मागणी.

 अतिवृष्टीमुळे शेत पिकाचे नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजारांची नुकसान भरपाईची मागणी.

चेतन लुतडे 

             भद्रावती तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने हजेरी लावली असल्याने भद्रावती तालुक्यातील सर्व नदी, नाले, तळे, भरगच्च भरून वाहू लागले आहे. होणाऱ्या सतत मुसळधार पावसामुळे तालुका जलमय झाला असून, शेतामध्ये पावसाचे पाणी साचले आहे. शेतात असलेल्या पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी अधिक चिंताग्रस्त झाला आहे. त्याकरिता भद्रावती तालुका ओला दुष्काळ ग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजारांची नुकसान भरपाई देण्याची मागणी आम आदमी पार्टी द्वारा करण्यात येत आहे. अनेक शेतकऱ्यांचे पेरणी करून नामांकित कंपनीचे बियाणे उगवले नाही उदाहरणात ओसवाल, विक्रांत, इ. शेतकऱ्यांवर आधीच दुबार पेरणीचे संकट आले असून यात अनेक शेतकऱ्यांनी कर्जबाजारी होऊन पेरणी करावी लागली आहे. या दुबार पेरणीने अनेक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहेत. 
 सतत मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे भद्रावती तालुक्यातील नदी, नाले, तलाव, तुडुंब भरून वाहत असल्यामुळे भद्रावती तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पुराचे पाणी चक्क शेतातून वाहत असल्याने काही शेतात पाणीदेखील साचून राहत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. यात सोयाबीन, तूर, कापूस, धान यासारख्या पिकांची मातीसह रोपटे वाहून गेले आहे. त्यामुळे भद्रावती तालुका हा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्‍टरी 50 हजाराची नुकसान भरपाई देण्याची मागणी उपस्थित  विकास गजभे, भारत बेलेकर, सूरज शाहा सुमित हस्थक यांनी केली आहे.

Comments