वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

*शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचे थकीत वीज बिल माफ व शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार अनुदान *किशोर टोंगे यांच्या मागणीला यश

*शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचे थकीत वीज बिल माफ व शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार अनुदान *
किशोर टोंगे यांच्या मागणीला यश

वरोरा :- 


          राज्यातील शेतकऱ्यांना नेहमीच अस्मानी संकटाबरोबरच अनेक आव्हानांचा सामना करावा लागत असतो. या वर्षी देखील विदर्भातील शेतकऱ्यांना सोयाबीनची नापिकी झाली असून त्यासोबत कापूस, धान,इ. मालाचे भाव पडल्याने शेतकऱ्यांना शेती न परवडणारी झाली होती.

आधीच शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना आता कृषीपंपाचे वीज बिल अनेक शेतकऱ्यांना हजारोच्या घरात आलेली आहेत. आधीच शेतकरी हवालदिल झाला असताना त्याची पूर्ण वीज बिल भरण्याची परिस्थिती नव्हती.

त्यामुळे शासन स्तरावर आढावा घेऊन ते कमी करण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा व शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.
तसेच शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाची नुकसान भरपाई मिळावी यासाठी किशोर टोंगे यांनी आंदोलन केले होते व वेळोवेळी शासन स्तरावर पाठपुरावा केला होता. या दोन्ही मागण्या आज अर्थसंकल्पात पूर्ण झाल्यात याविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच शेतकऱ्यांनी नवीन वीज जोडणी साठी दोन ते तीन वर्षापासून अर्ज केलेले आहेत, डिमांड देखील भरलेले आहेत मात्र अद्याप त्यांना वीज जोडणी मिळालेली नाही. त्यांना तात्काळ वीज जोडणी उपलब्ध होईल अशी आशा व्यक्त केली व या निर्णयाबद्दल शेतकऱ्यांच्या वतीने महायुती सरकारचे आभार मानले.

Comments