वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

गारपीटसह झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या : किशोर टोंगे**मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले निवेदन*

*गारपीटसह झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या : किशोर टोंगे*
*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले निवेदन* 

वरोरा 
 शनिवार दिनांक १० फेब्रुवारी २०२४ रोजी अचानक गारपीटसह मोठ्या प्रमाणात पाउस झाल्याने तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांचे ९०% रब्बी पिक हातातून गेले आहे. ही नुकसान भरपाई पंचनामे करून तात्काळ द्यावी यासाठी वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राचे युवा नेते, सामाजिक कर्यकर्ते किशोर टोंगे यांनी आज मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन मागणी केली.

यावेळी ते म्हणाले की, यापूर्वीच माझ्या वरोरा व भद्रावती तालुक्यातील शेतकरी सोयाबीन पिकांवर आलेल्या येलो मोझाक रोगामुळे पुरता संकटात होता त्यात हे गारपीट आमच्या शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे असून त्यांना अधिक संकटात नेणारा हार्दिक अवकाळी धक्का असं ते म्हणाले आहे.

सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे यांचे आमरण उपोषण

यासाठी तातडीने दोन्ही तालुक्याच्या तहसीलदारांनी यंत्रणेमार्फत तातडीने नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आदेश द्यावेत व पंचनामे पूर्ण करून तातडीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. 

शनिवारी रात्री अचानक वादळाला सुरवात झाली व अचानक गारांसह पाऊस सुरु झाल्याने शेतकऱ्यांचे हरभरा, गहू व तूर या रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतात व परिसारत वृक्ष कोसळले आहे. यात अनेक गावांचा व शेतपंपाचा विद्युत पुरवठा देखील खंडित झाला असून तो पूर्ववत करण्यात यावा असंही ते म्हणाले. 

प्रशासनाने तत्काळ पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी केली.


Comments