वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

विद्युत प्रीपेड मीटर लावण्याचा निर्णय रद्द करा**

*विद्युत प्रीपेड मीटर लावण्याचा निर्णय  रद्द करा*

*भद्रावती वंचित बहुजन आघाडीचे तहसीलदारांना निवेदन*
अतुल कोल्हे भद्रावती :-
              महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी तर्फे सर्वत्र प्रीपेड स्मार्ट मीटर लावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हा नागरिकांवर अन्याय आहे. त्यामुळे सदर मीटर लावण्याचे काम त्वरित थांबवून सदर प्रीपेड मीटर लावण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा यासाठी भद्रावती वंचित बहुजन आघाडी तर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्हा हा राज्यातील सर्वात मोठा विद्युत निर्मिती करणारा जिल्हा आहे. वीज निर्मितीसाठी लागणारा कोळसा हा सुद्धा जिल्ह्यातच उपलब्ध आहे. या जिल्ह्यात प्रदूषण निर्माण होऊन त्याचा त्रास जिल्ह्यातील नागरिकांना सोसावा लागत आहे. अशा अवस्थेत विद्युत विभागाने प्रीपेड मीटर लावण्याचा निर्णय घेऊन शहरातील तथा जिल्ह्यातील गोरगरिबांवर अन्याय केला आहे. सध्या विज बिल भरण्यासाठी चाळीस दिवसांचा अवधी दिला जातो. मात्र प्रीपेड मीटर लावल्यानंतर मुदत मिळत नसल्याने गोरगरिबांच्या घरात अंधार होण्याची शक्यता आहे. तरी हा निर्णय रद्द करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन सादर करताना वंचित बहुजन आघाडीचे विशाल कांबळे, हरिहर थुलकर, विठ्ठल पुनवटकर,डी.एस. रामटेके, अनुराग खाडे, सतीश मस्के, राखीताई रामटेके, संध्याताई पेटकर आदी उपस्थित होते.

Comments