वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

निष्क्रिय शासनाच्या विरोधात तुमगाव येथील शेतकऱ्याची गावबंदी.*गावातील शाळा ग्रामपंचायत व इतर शासकीय कार्यालये बंद .

निष्क्रिय शासनाच्या विरोधात तुमगाव येथील शेतकऱ्याची गावबंदी.
*
गावातील शाळा ग्रामपंचायत व इतर शासकीय कार्यालये बंद .



वरोरा
चेतन लुतडे

वरोरा शहरापासून 22 किलोमीटर अंतरावर असणारे मांगली- तुंमगाव मागील कित्येक वर्षापासून शासकीय योजनेपासून आणि सुख सुविधांपासून वंचित आहे. शासनाला बरेचदा मागण्या निवेदन सादर केले परंतु कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी गुरुवारी सकाळपासून या गावात येणारी शासकीय यंत्रणा बंद करण्यात आली आहे.
गावकऱ्यांनी गावात येणाऱ्या रोडच्या मधोमध बैल बंड्या आडव्या करून शासकीय यंत्रणेला बंदी घातली आहे. यावेळी गावातील जनतेने "शासन मुर्दाबाद शेतकरी जिंदाबाद," कामचुकार अधिकाऱ्यांचा निषेध असो. पाझरबोडी तलाव झालाच पाहिजे, शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळालाच पाहिजे., असे अनेक नारे देत रस्ता अडवून धरला आहे. यावेळी शासकीय यंत्रणेला गावातील लोक काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करत आहे.

गावकऱ्यांनी शासनाला आपल्या मागण्या सादर केले आहे जोपर्यंत ह्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत गाव बंदी उठणार नाही असा निर्णय या गावकऱ्यांनी घेतला आहे.

                       जलसंधारण विभागाच्या चुकीच्या धोरणामुळे तूमगाव मधील 30 ते 40  वर्षापासून अपूर्ण बांधकाम झालेले पाझर तलावा मुळे  अंदाजे १५० एकर जमीन दरवर्षी पुरबुडी  मध्ये जाते आहे. याची दखल अजून पर्यंत सरकारने घेतली नाही.

सोयाबीन पिकावर येलो मोझॅक रोग आल्याने शेतकऱ्याची नुकसान भरपाई अजून पर्यंत सरकारने दिली नाही.


शासन द्वारा   राबविण्यात येणारी प्रधानमंत्री पीक विमा योजना पासून ९०%शेतकरी अजूनही वंचित आहेत
गारपीठ झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे परंतु अजूनही  कोणताही निर्णय शासनाने घेतलेला नाही.
 
गावाला येण्यार्या रोडची दुरावस्था झालेली आहे.
अशा बऱ्याच मागण्यांकरिता शासनाच्या विरुद्ध गाव बंदी केली असून असेच उदासीन प्रशासकीय यंत्रणा राहिल्यास  येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत गावकरी बहिष्कार टाकणार अशी माहिती त्यांनी दिली आहे.



Comments