वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

वरोऱ्यात मिठाईच्या दराने विकले जात आहे खरड्याचे डबे*वैधमापन विभागाचे दुर्लक्ष

वरोऱ्यात मिठाईच्या दराने विकले जात आहे खरड्याचे डबे
*वैधमापन विभागाचे दुर्लक्ष

अनिल पाटील 
वरोरा 

वरोरा : कोणत्या वस्तूला केंव्हा कोणती किंमत येईल हे सांगता येत नसले तरी ग्राहकांना बनवून कोणती वस्तू कोणत्या दराने विकायची याची किमया व्यवसायिकांना चांगलीच  ठाऊक असते असे म्हणायला हरकत नाही. याचा प्रत्यय वरोरा येथे येत असून शहरातील काही मिठाई विक्रेते चक्क मिठाईच्या दरात खरड्याचे डब्बे विकत आहे. परंतु वैधमापन विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
वरोरा शहर आणि परिसरात अनेक मिठाईची दुकाने आहेत. या दुकानांमध्ये सहाशे रुपये प्रति किलो दरापासून तर एक हजार रुपये प्रति किलो दरापर्यंत मिठाई विक्रीला आहे. ग्राहक जेव्हा अशी मिठाई विकत घेण्यासाठी जातात, तेव्हा दुकानदाराने वजन काट्यावर मिठाई ठेवून तिचे वजन केल्यानंतर ती खरड्याच्या डब्यात भरणे अनिवार्य असते. परंतु अनेक दुकानदार तसे न करता चक्क खर्ड्याचा  डब्बाच वजन काट्यावर ठेवतात आणि त्यात मिठाई भरून मागितलेल्या वजना एवढे मिठाईचे डब्यासह वजन मोजून ती ग्राहकाला देतात. खर्ड्याच्या डब्यांचे वजन गृहीत धरले जात नसल्याने अतिशय अल्प दरात मिळणारे खर्ड्याचे डबेच मिठाच्या दराने विकले जात आहे हे स्पष्ट आहे. मिठाई दुकानदार अशाप्रकारे ग्राहकांची फसवणूक करत असताना वैधमापन विभागाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.

 
भाजीविक्रेत्यांची वजने तपासण्याची गरज

वरोरा शहरात दररोज भाजी बाजार भरत असतो. यातही रविवारी मुख्य बाजारपेठेत व आनंदवन चौकामध्ये भरणारा बाजार आणि बुधवार रोजी आनंदवन चौकामध्ये भरणारा भाजी बाजार हा ग्राहकांसाठी महत्त्वाचा असतो. या  भाजी बाजारामध्ये ग्राहकांची मोठी गर्दी असते. याचा गैरफायदा घेऊन भाजीविक्रेते ग्राहकांना वजनाच्या तुलनेत कमी भाजीपाला देत असल्याचे दिसून येते. त्यांच्याकडे असलेली वजने ही प्रमाणित नसून अप्रमाणित वजनाच्या माध्यमातून ते ग्राहकांची फसवणूक करीत आहे. डिजिटल वजना द्वारे सुद्धा ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. यामुळे याची दखल वैधमापन विभागाने घेण्याची गरज आहे.

Comments