लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

वरोऱ्यात मिठाईच्या दराने विकले जात आहे खरड्याचे डबे*वैधमापन विभागाचे दुर्लक्ष

वरोऱ्यात मिठाईच्या दराने विकले जात आहे खरड्याचे डबे
*वैधमापन विभागाचे दुर्लक्ष

अनिल पाटील 
वरोरा 

वरोरा : कोणत्या वस्तूला केंव्हा कोणती किंमत येईल हे सांगता येत नसले तरी ग्राहकांना बनवून कोणती वस्तू कोणत्या दराने विकायची याची किमया व्यवसायिकांना चांगलीच  ठाऊक असते असे म्हणायला हरकत नाही. याचा प्रत्यय वरोरा येथे येत असून शहरातील काही मिठाई विक्रेते चक्क मिठाईच्या दरात खरड्याचे डब्बे विकत आहे. परंतु वैधमापन विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
वरोरा शहर आणि परिसरात अनेक मिठाईची दुकाने आहेत. या दुकानांमध्ये सहाशे रुपये प्रति किलो दरापासून तर एक हजार रुपये प्रति किलो दरापर्यंत मिठाई विक्रीला आहे. ग्राहक जेव्हा अशी मिठाई विकत घेण्यासाठी जातात, तेव्हा दुकानदाराने वजन काट्यावर मिठाई ठेवून तिचे वजन केल्यानंतर ती खरड्याच्या डब्यात भरणे अनिवार्य असते. परंतु अनेक दुकानदार तसे न करता चक्क खर्ड्याचा  डब्बाच वजन काट्यावर ठेवतात आणि त्यात मिठाई भरून मागितलेल्या वजना एवढे मिठाईचे डब्यासह वजन मोजून ती ग्राहकाला देतात. खर्ड्याच्या डब्यांचे वजन गृहीत धरले जात नसल्याने अतिशय अल्प दरात मिळणारे खर्ड्याचे डबेच मिठाच्या दराने विकले जात आहे हे स्पष्ट आहे. मिठाई दुकानदार अशाप्रकारे ग्राहकांची फसवणूक करत असताना वैधमापन विभागाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.

 
भाजीविक्रेत्यांची वजने तपासण्याची गरज

वरोरा शहरात दररोज भाजी बाजार भरत असतो. यातही रविवारी मुख्य बाजारपेठेत व आनंदवन चौकामध्ये भरणारा बाजार आणि बुधवार रोजी आनंदवन चौकामध्ये भरणारा भाजी बाजार हा ग्राहकांसाठी महत्त्वाचा असतो. या  भाजी बाजारामध्ये ग्राहकांची मोठी गर्दी असते. याचा गैरफायदा घेऊन भाजीविक्रेते ग्राहकांना वजनाच्या तुलनेत कमी भाजीपाला देत असल्याचे दिसून येते. त्यांच्याकडे असलेली वजने ही प्रमाणित नसून अप्रमाणित वजनाच्या माध्यमातून ते ग्राहकांची फसवणूक करीत आहे. डिजिटल वजना द्वारे सुद्धा ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. यामुळे याची दखल वैधमापन विभागाने घेण्याची गरज आहे.

Comments