वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

आंदोलन करत्या १०० हून अधिक महिलांना पोलिसांच्या मदतीने घेतले ताब्यात**

*आंदोलन करत्या १०० हून अधिक महिलांना पोलिसांच्या मदतीने घेतले ताब्यात*

*३३६ ग्रामीण महिलांनी केपीसीएल कंपनीची कोळसा वाहतूक रोखली*

*उपोषणाचा ४२ वा दिवस : उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे आंदोलक महिलांनी सांगितले*

अतुल कोल्हे भद्रावती :
                कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड  कंपनीच्या विरोधात बरांज येथील प्रकल्पग्रस्त महिलांनी सुरू केलेल्या उपोषणाचा आज ४२ वा दिवस आहे.  ग्रामीण भागातील महिलेने केपीसीएल कोळसा खाणीतील वाहतूक दोन दिवसांपासून बंद ठेवली होती, मात्र तहसील व पोलीस प्रशासनाने कोळसा वाहतूक सुरू केली व आंदोलन करणाऱ्या शंभरहून अधिक महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
 आज जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या आदेशावरून या प्रशासनाने पोलीस प्रशासनाच्या मदतीने आंदोलन उधळून लावले, असा आरोप ग्रामीण महिलांनी केला आहे.अवैध कोळसा उत्खनन करणाऱ्या केपीसीएलला पाठीशी घालून प्रशासन बरांज प्रकल्पग्रस्त महिलांवर अन्याय करत आहे.असा आरोप ग्रामस्थ महिलांनी केला आहे. 
 बरांज मोकासा येथील केपीसीएल कंपनीने ९०० एकर जमीन संपादित करून कोळशाचे उत्पादन केले आहे, मात्र १२६९ घरांना गावातील नुकसानीची भरपाई मिळालेली नाही, त्यांचे पुनर्वसनही झालेले नाही.
 केपीसीएल कंपनीने शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या आणि त्यांना मोबदला दिला नाही.  बरांज मोकासा येथे राहणाऱ्या शेकडो घरांवर कब्जा करून कोळसा उत्पादन सुरू केले आहे.
 गेल्या ४२ दिवसांपासून ग्रामीण महिला उपोषणाला बसल्या असून प्रकृती अस्वास्थ्यामुळे तीन महिलांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  जीव गेला तरी उपोषण संपवणार नसल्याचं अजूनही उपोषणावर असलेल्या महिलांनी सांगितले.

 याबाबत भाद्रावतीचे तहसीलदार अनिकेत सोनवणे यांना विचारणा केली असता केपीसीएलच्या विरोधात गावातील महिला ४१ दिवसांपासून उपोषणावर होत्या.  या मागणीबाबत केपीसीएल कंपनीचे उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बैठका झाल्या, मात्र कोणताही तोडगा निघाला नाही.  अखेर शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये व  उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने पोलिसांनी उपोषणकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करत  जवळपास १०० महिलांना ताब्यात घेतले.

Comments