वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

केंद्र शासनाच्या नवीन चालक कायदा विरोधात आंदोलनाला सुरुवात

केंद्र शासनाच्या नवीन चालक कायदा विरोधात  आंदोलनाला सुरुवात 


वरोरा /चेतन लुतडे 

राष्ट्रवादीचे भद्रावती तालुकाप्रमुख सुधाकर रोहनकर यांचे नेतृत्वात वरोरा उपविभागीय कार्यालयावर आज ड्रायव्हर चालकांनी निवेदन देऊन केंद्र सरकारचा निषेध नोंदविला आहे.


यावेळी चालकांनी नारेबाजी करीत रद्द करा रद्द करा जुलमी कायदा रद्द करा, मोदी शासन मुर्दाबादच्या घोषणा देत चालकांनी आपला संताप व्यक्त केला.

केंद्र शासनाने नवीन चालक कायदा पारित करीत चालकाच्या हातून अपघात झाल्यास दहा लाख रुपये दंड व दहा वर्षाची शिक्षा अशी तरतूद केली आहे. या कायद्याला त्वरित रद्द करण्याची मागणी ड्रायव्हर संघटनेने केली आहे. महाराष्ट्रात सगळीकडे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले आहे या कायद्याचा निषेध नोंदवत संघटना रस्त्यावर उतरतील अशी धमकी सरकारला दिली आहे.

आधीच वाहन चालवीत असताना अनेक संकटांना ड्रायव्हरला तोंड द्यावे लागते.चालकांच्या वाहनाने अपघात झाल्यानंतर चालक जर घटनास्थळी थांबला तर त्याला जमावाकडून जीवे मारण्याची शक्यता असते.

तसेच चालक हा आर्थिकदृष्ट्या गरीब असल्याने तो दहा लाख दंड देऊ शकत नाही.दहा वर्षाची शिक्षा झाल्यास त्याचा कुटुंब उध्वस्त होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे या कायद्यांचा निषेध नोंदवत ड्रायव्हर संघटना उग्र झाले आहे.


Comments