लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

सोयाबीन पिकाचे झालेले नुस्कानीची पाहणी पीक विम्यात सामील करून हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत सरकारने द्यावी.तसेच चालू शेतकरी यांना प्रोत्साहन पर रक्कम देण्यात यावी.


सोयाबीन पिकाचे झालेले नुस्कानीची पाहणी  पीक विम्यात सामील करून हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत सरकारने द्यावी.
तसेच चालू शेतकरी यांना प्रोत्साहन पर रक्कम देण्यात यावी.

वरोरा
चेतन लूतडे वरोरा 
जिल्ह्यातील सोयाबीनचे पीक पूर्णता उध्वस्त झाले असून ठीक ठिकाणी मोर्चा आणि निवेदने शेतकरी देत आहे. यावर्षी शेतकर्यांनी मोठया प्रमाणात सोयाबीन पीक घेतले आहे मात्र काही दिवसा अगोदर मोझ्याक रोगाने थैमान घातले , त्यामध्ये पन्नास टक्के सोयाबीन पिकाचे नुस्कान झाले. लगेच दोन ते तीन दिवसात बुरशी सारखा रोग आला आणि पूर्ण सोयाबीन पीक नष्ट झाले.  नुकसान झालेल्या पिकाचे पंचेनामे करून पीक विम्यात सामावून घेऊन शेतकर्याला हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत सरकारने करावी,  सोयाबीन पिकाचे नुकसान झालेल्या शेतकर्पीयाला  विमा कंपनी सोबत संपर्क साधला आहे मात्र तो अजून पर्यंत शेतकर्याच्या नुकसानीचे  नोंद पिक विमा कंपनीने केलेले नाही. त्यामुळे सरकारने एक रुपया काढलेल्या विम्या मध्ये सामावून अनुदान द्यावे.
यासाठी ते टेंमूर्डा येथे नागपूर महामार्ग काही वेळापुरता अडवून मोर्चा करण्यात आला.

आपल्या महाराष्ट्र सरकारने महात्मा जोतिबा फुले कर्ज माफी जाहीर केली मात्र याची यादी मधून काही शेतकरी यांचे नावेच नाही तर काही शेतकरी यांना अजूनही कर्ज माफिचा लाभ दिलेला नाही. सदर निवेदनाची दोन ते तीन दिवसात दखल घेऊन शेतकरी यांना न्याय मिळवून द्यावा अन्यथा सोमवारी टेम्रूडा येथे शेतकरी यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले मात्र या आंदोलनाची सदर दखल न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येत टाला ठोको आंदोलन करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी. असे आवाहन किशोर डुकरे यांनी यावेळी केले.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

                        

Comments