वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

जामगांव खुर्द येथे शेतकऱ्याची आत्महत्या...सरकार लक्ष देणार का?

शेतकरी बांधवांनो आत्महत्या करू नका...किशोर टोंगे तुमचा लढा लढणार! 

जामगांव खुर्द येथे शेतकऱ्याची आत्महत्या...सरकार लक्ष देणार का? 

वरोरा:

वरोरा आणि भद्रावती तालुक्यात अज्ञात रोगाने सोयाबीनचे पीक समूळ नष्ट होत असून याविषयी शेतकरी सातत्याने आक्रोश करत असून सरकारने अजूनही दखल घेतली नाही. याला कंटाळून आज जामगांव खुर्द,तालुका वरोरा येथे गजानन घागी या शेतकऱ्याने शेतात गळफास लावून आत्महत्या केली आहे.

शेतकऱ्यांचा हा प्रश्न गंभीर असून तुमच्यासाठी मी हा लढा लढणार असून सरकारला मदत करण्यासाठी भाग पाडणार आहे मात्र आपण असं कुठलही टोकाचं पाऊल उचलून आपलं जीवन संपवू नये असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले.

सरकारने वरोरा भद्रावती तालुक्यातील शेतकरी बांधवांची परिस्थिती लक्षात घेऊन तातडीने मदत जाहीर करावी. यासाठी आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व कृषिमंत्री यांच्याकडे शेतकऱ्यांच्या मागण्या निवेदनाद्वारे सादर केल्या आहेत. याची तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करू असे किशोर टोंगे यांनी जाहीर केले.

Comments