1

प्रति  माननीय गटशिक्षण अधिकारी साहेब, पंचायत समिती वरोरा जिल्हा चंद्रपूर. विषय-अंशकालीन निदेशक नेमणूक करताना होत असलेल्या अन्यायाबाबत. अर्जदार- विशाखा विलास गुजर टिळकवाड वरोरा जिल्हा चंद्रपूर, संपर्क ९५७९७३४२२९.  महोदय. मी सौ विशाखा विलास गुजर (लुतडे) राहणार वरोरा. सध्या मी पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आनंदवन येथे सन २०१२ पासून २०१९ पर्यंत अंशकालीन निदेशक पदावर कार्यरत होते. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्फत गुणांकन व मुलाखत प्रक्रियेनंतर दिनांक १९/७/ २०२५ रोजी मला अंशकालीन कला निदेशक पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आले होते. या पदावर माझी मेरिट पद्धतीने निवड करण्यात आली होती.  मात्र एका महिन्याच्या आतच गटशिक्षण अधिकारी यांच्या आदेशान्वये केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्या सहीचे पत्र मला प्राप्त झाले ज्या द्वारे माझी नियुक्ती ७/८/२०२५ पासून रद्द करण्यात आल्याचे लेखी स्वरूपात कळविण्यात आले त्यामुळे मला मानसिक त्रास सहन करावा लागला . मी २०१६ पासून पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आनंदवन शाळेमध्ये कला निदेशक पदावर कार्यरत...

जामगांव खुर्द येथे शेतकऱ्याची आत्महत्या...सरकार लक्ष देणार का?

शेतकरी बांधवांनो आत्महत्या करू नका...किशोर टोंगे तुमचा लढा लढणार! 

जामगांव खुर्द येथे शेतकऱ्याची आत्महत्या...सरकार लक्ष देणार का? 

वरोरा:

वरोरा आणि भद्रावती तालुक्यात अज्ञात रोगाने सोयाबीनचे पीक समूळ नष्ट होत असून याविषयी शेतकरी सातत्याने आक्रोश करत असून सरकारने अजूनही दखल घेतली नाही. याला कंटाळून आज जामगांव खुर्द,तालुका वरोरा येथे गजानन घागी या शेतकऱ्याने शेतात गळफास लावून आत्महत्या केली आहे.

शेतकऱ्यांचा हा प्रश्न गंभीर असून तुमच्यासाठी मी हा लढा लढणार असून सरकारला मदत करण्यासाठी भाग पाडणार आहे मात्र आपण असं कुठलही टोकाचं पाऊल उचलून आपलं जीवन संपवू नये असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले.

सरकारने वरोरा भद्रावती तालुक्यातील शेतकरी बांधवांची परिस्थिती लक्षात घेऊन तातडीने मदत जाहीर करावी. यासाठी आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व कृषिमंत्री यांच्याकडे शेतकऱ्यांच्या मागण्या निवेदनाद्वारे सादर केल्या आहेत. याची तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करू असे किशोर टोंगे यांनी जाहीर केले.

Comments