वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसेनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन*अज्ञात रोगाने सोयाबीनचे हातात आलेले पीक करपले.*सरकारने एकरी 40 हजार रुपये अनुदान सरसकट द्यावे.

शेतकऱ्यांचे कैवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते

अज्ञात रोगाने सोयाबीनचे हातात आलेले पीक करपले.

सरकारने एकरी 40 हजार रुपये अनुदान सरसकट द्यावे.

वरोरा

चंद्रपूर जिल्ह्यातील सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांच्या हातात आले असताना अचानक अज्ञात रोगाने सोयाबीन या पिकाला पूर्णता नष्ट केले आहे. मोजाक आणि खोड अळी किंवा पांढरी माशी यांच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील सोयाबीन पीक पूर्णतः नष्ट झाले असून जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत आहे. कृषी विभागाकडून या रोगाविषयी अजून कोणतीही स्पष्टता आलेली नाही.

त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नेते शेतकऱ्याच्या पाठीशी असून यासाठी निवेदन व मोर्चा काढत आहे. 

चंद्रपूर जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह तहसीलदारांना निवेदन सादर केले. शेतकऱ्यांचे कैवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने शेतकऱ्यांसाठी यावेळी  एक रुपयात विमा काढला होता. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना या विम्याचा लाभ देण्यात यावा. किंवा ज्या शेतकऱ्यांनी विमा काढला नसेल त्यासाठी सरकारने सरसकट एकरी चाळीस हजार रुपये अनुदान द्यावे अशी मागणी निवेदनातून केली आहे. यावेळी जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांसाठी नक्की अनुदान देतील अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी , शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Comments