वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

स्मशानात जाण्यासाठी सुद्धा हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात. ग्रामपंचायत जळका येथील सरपंच ,सचिव यांचे दुर्लक्ष

स्मशानात जाण्यासाठी सुद्धा हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात.

ग्रामपंचायत जळका येथील सरपंच ,सचिव यांचे दुर्लक्ष

वरोरा
चेतन लूतडे 


वरोरा तालुक्यातील माढळी जवळ असलेल्या जळका गावातील रस्त्याची दयनीय अवस्था असून स्मशानात जाण्यासाठी सुद्धा हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात.

जळका या गावाच्या काही अंतरावर स्मशानभूमी असून या स्मशानभूमी कडे जाणारा मार्गची  दैनावस्था झाली की हा रस्ता पुर्णतः खराब झालेला आहे. या रस्त्याच्या मधोमध पाणी वाहत असून रस्ता आहे की नाला हे कळयला मार्ग नाही.
 अंत्यसंस्काराला जाणारे लोक  तसेच  मयत घेऊन चालणारे कधीही प्रेत घेऊन खाली पडू शकेल एवढा हा रस्ता खराब झालेला आहे.  गावातील काही लोकांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना अनेक वेळा या स्मशानभूमी रस्त्याबद्दल बोलूनही  याकडे जळका गावातील सरपंच, सचिव तसेच प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. अंत्यसंस्काराला जाणाऱ्या लोकांचे कधीही रस्त्यावर पडून नुकसान होऊ शकते. कमीत कमी ग्रामपंचायत मधील सामान्य फंडातून  तात्काळ रस्ता करावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
या गावात ग्रामपंचायतीने मरण पावलेल्या  लोकांसाठी तरी रस्ता करून द्यावा. असा लाजिरवानाआ प्रश्न सरपंच व सचिवाला लोक विचारत आहे.

गावकऱ्यांचे  स्मशानभूमी कडे जाण्यासाठी हाल होत असून हा  रस्ता केव्हा बनणार असे सर्व गावकरी बोलून रोष व्यक्त करीत आहे. त्यामुळे वरिष्ठ प्रशासनाने आवर्जून लक्ष देणे गरजेचे आहे.

 

Comments