वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या काळात शुभारंभ झालेला पाझरबोडी तलाव अजूनही थंडबस्त्यात.

माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या काळात शुभारंभ झालेला पाझरबोडी तलाव अजूनही थंडबस्त्यात.

लघु पाटबंधारे विभाग चंद्रपूर यांचे दुर्लक्ष.

गावकरी आंदोलन उभारणार.

चेतन लूतडे
वरोरा 25/7/23

वरोरा तालुक्यातील 22 किलोमीटर अंतरावर तुमगाव गावामध्ये तलाव निर्मितीचे कार्य माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या काळात सुरू झाले होते. मात्र गेल्या 30 वर्षाच्या कालावधीत हा तलाव पूर्ण होऊ शकला नाही.
उमरी -तुंमगाव या गावांमध्ये अंदाजे 1987 साली माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते पाझरबोडी तलावाच्या कामाचे शुभारंभ करण्यात आले होते.  यानंतर या कामांमध्ये बराच व्यत्यय आला. 2005 साली पुन्हा कामाला सुरुवात करून 2007 साली बंद करण्यात आले. त्यावेळेस जमीन संपादन करीत असताना जमीन मालकांना मोबदला दिला गेला होता. पाझरबोडी तलावाच्या पाळीचे काम सुरू झाले होते. दोन्हीही बाजूंना तलावाची पाळ बांधण्यात आली. मात्र 2007 पासून काम पूर्णतः थांबल्याने या दोन पाळीच्या मधातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. हे सर्व पाणी दरवर्षी पावसाळ्यात शेकडो शेतकऱ्यांची शेतीचे नुकसान करीत जात आहे. त्यामुळे येथील शेतकरी त्रासले असून पाझरबोडी तलावाचे काम पूर्ण करावे. अन्यथा बांधलेल्या पाळी काढून टाकाव्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

या तालाव्याच्या पाळीमुळे उमरी ,तूमगाव, बोपापूर परिसरातील शेकडो हेक्टर जमीन पाण्याचा प्रवाहाने नापीक होऊन राहिली आहे. गेल्या 30 वर्षापासून येथील शेतकरी हा त्रास सहन करत असून लघु पाटबंधारे विभाग चंद्रपूर यांना वारंवार तक्रारी व निवेदन देऊन सुद्धा जाग येत नाही आहे. 
या परिसरातील शेतकऱ्यांनी उभारलेले कुकूटपालन, बकरी पालन, जनावरासाठी उभारलेले गोठे, शेतीतील सोयाबीन ,कापूस, शासनाने बनवलेले रोड अशी अनेक हानी झाली असून याला जबाबदार लघु पाटबंधारे विभाग चंद्रपूर असल्याचे तेथील  गावकरी डॉक्टर विवेक तेला यांनी सांगितले.
त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांनी लघु पाटबंधारे विभाग चंद्रपूर यांच्या कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.

जाहिरात

Comments