वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

दिंडोदा बॅरेज प्रकल्पग्रस्तांचे नदीपात्रात मानवी साखळी आंदोलन बैलांची सुद्धा साखळी लावण्यात आली .

दिंडोदा बॅरेज प्रकल्पग्रस्तांचे नदीपात्रात मानवी साखळी आंदोलन  

बैलांची सुद्धा साखळी लावण्यात आली होती.

३२ गावातील प्रकल्पग्रस्त यांचा बैलबंडी मोर्चा. 

वरोरा
चेतन लूतडे 

वरोरा तालुक्यातील दिंडोदा या गावाजवळ वर्धा नदीपात्रात दोन दिवसाचे आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांच्या सर्व परिवारातील कुटुंबीयांनी रात्रभर जागून भजन कीर्तन करत हे आंदोलन वर्धा नदी पात्रात सुरू केले होते. दिंदोडा बॅरेज प्रकल्पात तीन जिल्ह्यातील  यवतमाळ,चंद्रपूर, वर्धा गावातील ११०० शेतकर्याची १४००हेक्टर जमीन या प्रकरणात हस्तांतरित करण्यात आली आहे. 1993 साला यांना सानुग्रह अनुदान म्हणून हेक्टरी तीन लाखाची मदत सरकारने केली होती. तेव्हा ती जागा निपों अँड डेड्डोला देण्यात आली होती. मात्र यानंतर दिंदोडा बॅरेज  प्रकल्पात ही जमीन हस्तांतरण करण्यात आली होती. मात्र शेतकऱ्यासंबंधीतील अवार्ड, पुनर्वसन, किंवा वाढीव सानुग्रह अनुदान अजून पर्यंत देण्यात आले नाही.

 त्यामुळे सरकार कडे 2013 च्या नवीन कायद्यानुसार जमिनीचा योग्य मोबदला  व पुनर्वसन- शेतमजूर  यांना योग्य पॅकेज. मिळण्याची मागनी करत आहे.
या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी व सहभागी होण्यास ज्ञानेश्वर रक्षक-गुरुदेव सेवा मंडळ, दिनानाथ वाघमारे व मुकुंद अडेवार-विमुक्त भटके संघर्ष समिती,  यांनी पाठिंबा दिला आहे.
बऱ्याच वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित असून अधिवेशन सुरू असल्याने शेतकऱ्यांनी दिंदोडा बॅरेज प्रकल्पाचे काम बंद पडले आहे. शेतकरी आक्रमक झाले असून न्याय मिळवण्यासाठी नदीपात्रात आंदोलन करत आहे.

हे बॅरेज भद्रावती येथे १९९३ मध्ये होवू घातलेल्या निप्पोन डेनरो साठी होणार होते.पण निप्पोन डेनरो रद्द झाले.अन दिंडोदा बॅरेज थंड बस्त्यात गेले.मग एकदम २०१७ ला हा प्रकल्प सिंचन प्रकल्प म्हणून जाहिर झाला.आज या प्रकल्पाची किंमत चवदाशे कोटी झाली आहे.
पण शेतक-यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला, योग्य पुनर्वसन, मच्छीमार, शेतमजुरांना योग्य पॅकेज ,ही बाधीत ३२ गावाची -तीनही जिल्ह्यातील मागणी आहे.
सरकार तातडीने लक्ष घालावे व ३२ गावाच्या लोकांना न्याय द्यावा एवढी  मागणी करत आहे.

Comments