वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या चंद्रपूर एन्ट्रीने प्रशासकीय कामाला वेग

विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या चंद्रपूर एन्ट्रीने प्रशासकीय कामाला वेग 
          शिवसेनेच्या प्रयत्नाने २३ शेतकऱ्यांना मिळाली ११ लाखाची मदत 

वरोरा :- तालुक्यातील चरुरखटी - नायदेव या रस्त्याने एकोना कोळसा खदान मधून जी एम आर कंपनी मध्ये कोळसा वाहतूक केली जाते . या वाहतुकीमुळे रस्त्यालगत असणाऱ्या शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.  शिवसेनेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे  जिल्हा प्रमुख मुकेश जिवतोडे यांनी  या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत निवेदन देऊन गेल्या एक वर्षांपासून   पाठपुरावा केला होता. तसेच नुकतेच  विधानपरिषदेचे  विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे हे चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर आले असतांना त्यांना या समस्येचे निवेदन देताच प्रशासकीय कामाला वेग आला असून १६ फेब्रुवारीला नुकसानग्रस्त २३ शेतकऱ्यांना ११ लाख रुपये नुकसान भरपाईचे धनादेश देण्यात आले . 

शहरालगत  एम आय डी सी येथे  २ वीजनिर्मिती केंद्र या  कंपन्यांना एकोना कोळसा खदान येथून कोळसा पुरविला जातो . नियमबाह्य केल्या जाणाऱ्या कोळसा वाहतुकीमुळे चरुरखटी - नायदेव रस्त्यालगत असणाऱ्या शेतींचे  नुकसान होत आहे . या बाबत वरोरा तहसीलदार यांचे कडे  नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी  नुकसान भरपाई मिळण्याबाबत निवेदन दिले होते . निवेदनाची दखल न घेतल्याने व समस्या जैसे थे असल्याने शेतकऱ्यांनी शिवसेना कार्यालय गाठले व शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या समोर आपली व्यथा मांडली. शेतकरी हा देशाचा कणा आहे आणि त्याच्यावर होणार अन्याय  शिवसेना कदापि सहन करणार नाही असे म्हणत जिवतोडे यांच्या नेतृत्वात प्रशासनाला निवेदन व सदर विषयासंबंधी पाठपुरावा करण्यात आला . संबंधित साझाचे तलाठी , कृषी अधिकारी यांनी मौका चौकशी करून अहवाल तहसील कार्यालय येथे सादर केला . तहसीलदारांनी संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याबाबत आदेश देऊनही कंपनी व्यवस्थापनाने मोबदला दिला नव्हता . हि बाबा मुकेश जिवतोडे यांनी चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर आलेल्या विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या निदर्शनात आणून दिली होती. दानवे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्यानंतर  प्रशासन कामाला लागले व १६ फेब्रुवारीला २३ शेतकयांना ११ लाखांचा मोबदला देण्यात आला . शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश जिवतोडे यांनी केलेल्या प्रयत्नामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याने शेतकऱ्यांनी मुकेश जिवतोडे यांचे आभार मानले . मुकेश जिवतोडे व शिवसैनिकांच्या हस्ते शेतकऱ्यांना धनादेश वाटप करण्यात आले .यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख मनीष जेठानी , भद्रावती तालुका प्रमुख नंदू पढाल, शिवसेना शहर प्रमुख संदीप मेश्राम , माजी नगरसेवक दिनेश यादव , बंडू डाखरे , यांच्या सह अनेक शिवसैनिक व  शेतकरी उपस्थित होते .

Comments