वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

छावा छात्र संघटनेचे मारेगावात धरणे आंदोलनशिंदे सरकारचा केलात निषेध

छावा छात्र संघटनेचे मारेगावात धरणे आंदोलन
शिंदे सरकारचा केलात निषेध 

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना  १३,६०० हेक्टरी घोषणा करूनही तोडगी मदत  मारेगाव तालुका ओला दुष्काळग्रस्त जाहीर करून  हेक्टरी ५०,००० मदत द्या.

यवतमाळ/मारेगाव : सुरज झोटिंग
मो.९२८४०६०८२०
मारेगाव : पर्जन्यवृष्टीने शेतपिके उध्वस्त झाली.शासनाने दिवाळीपूर्वी मदतीची घोषणा केली.मात्र शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेल्याने शेतकरी वर्गात संताप व्यक्त होत आहे.अशातच शिंदे सरकारच्या बोथट धोरणा विरोधी गगनभेदी घोषणा देत मारेगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा अशी आर्जव मागणी छावा छात्र संघटने कडून करण्यात आली.मारेगाव तालुक्याला पर्जन्यवृष्टीने झोडपून शेतकऱ्यांचे उभी पिके उध्वस्त केली. सरकारने मदतीची १३,६०० हेक्टरी घोषणाही केली.मात्र तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांना ही मदत तोडकी स्वरूपात मिळत असल्याचे वास्तव आहे.हा सरकारचा केवळ देखावा बंद करावा व शेतकऱ्यांना निकषाप्रमाणे मदत करावी अशी मागणी मारेगाव मध्यवर्ती बँक समोर धरणे आंदोलन करतेवेळी करण्यात आली.यावेळी शासन विरोधी घोषणा देत वर्तमान सरकार हे उद्योजकांचे कर्ज माफ करणारे असून कृषी प्रधान देशाचा पोशिंदा मात्र आत्महत्या करतो आहे.मात्र सरकार तगलादू धोरण अवलंबित असल्याचा आरोप करीत  शासनाच्या या दुटप्पी धोरणाचा तिव्र शब्दात निषेध करण्यात आला.
      प्रदेशाध्यक्ष अनिल पारखी , महिला विदर्भ प्रांत अध्यक्ष प्रतिभा तातेड , जिल्हाध्यक्ष राजू जुनगरी ,विदर्भ प्रांत अध्यक्ष विलास बुरांन या पदाधिकारी सह राहुल सूर , अनिल बोढाले , संदीप हूसुकले, सुधाकर कोंडेकर , दादा बोकडे , अनंता घोटेकर यांचेसह बहुसंख्य शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

Comments