लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

केंद्रीय योजना सर्व स्तरावर राबवाव्यात**केंद्रीय मंत्र्यासोबत संवाद साधताना केली मागणी*

*केंद्रीय योजना सर्व स्तरावर राबवाव्यात*

*केंद्रीय मंत्र्यासोबत संवाद साधताना केली मागणी*

वरोडा : श्याम ठेंगडी 

           केंद्राच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीत शहरी, ग्रामीण व जिल्हास्तरीय असा भेदभाव न करता या योजना सर्वसामान्यांसाठी सर्वच स्तरांवर राबविल्या जाव्यात मात्र प्रत्येक जिल्ह्यात या योजना राबवताना पक्षातील एखाद्या ज्येष्ठ तज्ञ नागरिकाची या योजनात नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी येथील राष्ट्रसेविका समितीच्या कार्यकर्त्या व सावित्रीबाई फुले महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या अध्यक्षा सुवर्णरेखाताई पाटील यांनी केंद्रीय पेट्रोलियम आवास व शहरी विकास मंत्री  हरदिपसिंग  पुरी यांचेकडे केली.
         चंद्रपूर येथील एनडी हॉटेल येथे आयोजित  जनसंघाच्या काळातील जेष्ठ कार्यकर्त्यांशी मंत्री महोदय संवाद साधत होते.त्यावेळी सुवर्णरेखाताई पाटील यांनी ही मागणी केली.
      केंद्र शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी खर्चिक आजारासाठी आयुष्यमान भारत योजनेच्या धर्तीवर एखादी आरोग्य सेवा योजना आखावी. मात्र ही योजना सर्व स्तरावर ,सर्व प्रवर्गासाठी असावी अशी मागणी त्यांनी केली . 
     तसेच जनसंघाच्या ज्या कार्यकर्त्यांच्या पुण्याईवर भाजप आज जगात सर्वात मोठी सदस्य संख्या असलेला पक्ष बनला व एक मजबूत राजकीय शक्ती म्हणून उदयास आलेला आहे. त्या जनसंघाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांकडे पक्षाने दुर्लक्ष न करता त्यांना पक्षात मानाचे स्थान द्यावे अशीही मागणी त्यांनी यावेळी बोलताना केली.
         जे मंदिर किंवा इतर धर्मीय प्रार्थना स्थळातील प्रशासन तेथील पुजाऱ्यांच्या पुनर्जीवनाची सोय करू शकत नाही.  तेथील पुजाऱ्यांसाठी केंद्र शासनाने एखादी लाभदायी योजना आखावी अशी मागणी ही त्यांनी यावेळी बोलताना केली

Comments