1

प्रति  माननीय गटशिक्षण अधिकारी साहेब, पंचायत समिती वरोरा जिल्हा चंद्रपूर. विषय-अंशकालीन निदेशक नेमणूक करताना होत असलेल्या अन्यायाबाबत. अर्जदार- विशाखा विलास गुजर टिळकवाड वरोरा जिल्हा चंद्रपूर, संपर्क ९५७९७३४२२९.  महोदय. मी सौ विशाखा विलास गुजर (लुतडे) राहणार वरोरा. सध्या मी पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आनंदवन येथे सन २०१२ पासून २०१९ पर्यंत अंशकालीन निदेशक पदावर कार्यरत होते. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्फत गुणांकन व मुलाखत प्रक्रियेनंतर दिनांक १९/७/ २०२५ रोजी मला अंशकालीन कला निदेशक पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आले होते. या पदावर माझी मेरिट पद्धतीने निवड करण्यात आली होती.  मात्र एका महिन्याच्या आतच गटशिक्षण अधिकारी यांच्या आदेशान्वये केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्या सहीचे पत्र मला प्राप्त झाले ज्या द्वारे माझी नियुक्ती ७/८/२०२५ पासून रद्द करण्यात आल्याचे लेखी स्वरूपात कळविण्यात आले त्यामुळे मला मानसिक त्रास सहन करावा लागला . मी २०१६ पासून पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आनंदवन शाळेमध्ये कला निदेशक पदावर कार्यरत...

मागण्यासाठी संपावर गेलेले डाक कर्मचारी नागरिक त्रस्त

मागण्यासाठी संपावर गेलेले डाक कर्मचारी नागरिक त्रस्त

भद्रावती :सरकारचे खाजगीकरणाचे वाढते पाऊल पाहता पोस्ट ऑफिसवाल्यांनी एक दिवसीय बंदचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे बुधवार आज दिनांक १० रोजी पोस्ट ऑफिस बंद राहिल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. या राखी सणाच्या काळात टपाल कार्यालय बंद राहिल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. भारतीय टपाल कार्यालयाचे खाजगीकरण करण्याच्या सरकारच्या वाढत्या हालचाली लक्षात घेता, टपाल कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संघटनेला सरकारला इशारा देण्यासाठी एक दिवसीय बंदचे आयोजन करण्यात आले होते. आणि हे पाहता अखिल भारतीय पोस्ट ऑफिस बंद असल्याची बाब समोर आली. भद्रावती पोस्ट ऑफिससमोर आलेल्या सर्व लोकांना पोस्ट ऑफिस का बंद आहे हे समजू शकले नाही. कारण पोस्ट ऑफिसजवळ ना कोणत्याही प्रकारची माहिती देणारे फलक लावण्यात आले होते ना कोणत्याही प्रकारची माहिती देणारे पोस्टर चिकटवण्यात आले होते. या सणासुदीच्या दिवशी पोस्ट ऑफिस का बंद असते हे लोकांना समजू शकले नाही. हे पोस्ट ऑफिसच्या लोकांचे काम होते, त्यांनी किमान पोस्ट ऑफिससमोर या प्रकरणाची माहिती देण्यासाठी तेथे कोणत्याही प्रकारची माहिती लिहिली नाही. भद्रावती पोस्ट ऑफिसच्या कर्मचार्‍यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, आम्ही तिथे एक छोटासा फलक लावला होता, मात्र तो पावसामुळे काढला गेला असावा. पण लोकांच्या माहितीसाठी आम्ही ते फलकावर लावले आहे.

Comments