वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

मागण्यासाठी संपावर गेलेले डाक कर्मचारी नागरिक त्रस्त

मागण्यासाठी संपावर गेलेले डाक कर्मचारी नागरिक त्रस्त

भद्रावती :सरकारचे खाजगीकरणाचे वाढते पाऊल पाहता पोस्ट ऑफिसवाल्यांनी एक दिवसीय बंदचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे बुधवार आज दिनांक १० रोजी पोस्ट ऑफिस बंद राहिल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. या राखी सणाच्या काळात टपाल कार्यालय बंद राहिल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. भारतीय टपाल कार्यालयाचे खाजगीकरण करण्याच्या सरकारच्या वाढत्या हालचाली लक्षात घेता, टपाल कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संघटनेला सरकारला इशारा देण्यासाठी एक दिवसीय बंदचे आयोजन करण्यात आले होते. आणि हे पाहता अखिल भारतीय पोस्ट ऑफिस बंद असल्याची बाब समोर आली. भद्रावती पोस्ट ऑफिससमोर आलेल्या सर्व लोकांना पोस्ट ऑफिस का बंद आहे हे समजू शकले नाही. कारण पोस्ट ऑफिसजवळ ना कोणत्याही प्रकारची माहिती देणारे फलक लावण्यात आले होते ना कोणत्याही प्रकारची माहिती देणारे पोस्टर चिकटवण्यात आले होते. या सणासुदीच्या दिवशी पोस्ट ऑफिस का बंद असते हे लोकांना समजू शकले नाही. हे पोस्ट ऑफिसच्या लोकांचे काम होते, त्यांनी किमान पोस्ट ऑफिससमोर या प्रकरणाची माहिती देण्यासाठी तेथे कोणत्याही प्रकारची माहिती लिहिली नाही. भद्रावती पोस्ट ऑफिसच्या कर्मचार्‍यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, आम्ही तिथे एक छोटासा फलक लावला होता, मात्र तो पावसामुळे काढला गेला असावा. पण लोकांच्या माहितीसाठी आम्ही ते फलकावर लावले आहे.

Comments