लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

मागण्यासाठी संपावर गेलेले डाक कर्मचारी नागरिक त्रस्त

मागण्यासाठी संपावर गेलेले डाक कर्मचारी नागरिक त्रस्त

भद्रावती :सरकारचे खाजगीकरणाचे वाढते पाऊल पाहता पोस्ट ऑफिसवाल्यांनी एक दिवसीय बंदचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे बुधवार आज दिनांक १० रोजी पोस्ट ऑफिस बंद राहिल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. या राखी सणाच्या काळात टपाल कार्यालय बंद राहिल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. भारतीय टपाल कार्यालयाचे खाजगीकरण करण्याच्या सरकारच्या वाढत्या हालचाली लक्षात घेता, टपाल कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संघटनेला सरकारला इशारा देण्यासाठी एक दिवसीय बंदचे आयोजन करण्यात आले होते. आणि हे पाहता अखिल भारतीय पोस्ट ऑफिस बंद असल्याची बाब समोर आली. भद्रावती पोस्ट ऑफिससमोर आलेल्या सर्व लोकांना पोस्ट ऑफिस का बंद आहे हे समजू शकले नाही. कारण पोस्ट ऑफिसजवळ ना कोणत्याही प्रकारची माहिती देणारे फलक लावण्यात आले होते ना कोणत्याही प्रकारची माहिती देणारे पोस्टर चिकटवण्यात आले होते. या सणासुदीच्या दिवशी पोस्ट ऑफिस का बंद असते हे लोकांना समजू शकले नाही. हे पोस्ट ऑफिसच्या लोकांचे काम होते, त्यांनी किमान पोस्ट ऑफिससमोर या प्रकरणाची माहिती देण्यासाठी तेथे कोणत्याही प्रकारची माहिती लिहिली नाही. भद्रावती पोस्ट ऑफिसच्या कर्मचार्‍यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, आम्ही तिथे एक छोटासा फलक लावला होता, मात्र तो पावसामुळे काढला गेला असावा. पण लोकांच्या माहितीसाठी आम्ही ते फलकावर लावले आहे.

Comments