वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

ताडाळी रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुर्दशा

ताडाळी रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुर्दशा।
*कोलवाँशरीच्या अवजड वाहनांमुळे रस्त्याची दैयनीय अवस्था*.
 (भद्रावती):- रेल्वे स्थानकापासून चंद्रपूर नागपूर महामार्गाला जोडणारा रस्ता गुपता कोलवाँशरीजतून कोळसा घेऊन येणाऱ्या अवजड वाहनांमुळे रस्ता पूर्णपणे खराब अवस्थेत असून या रस्त्यातून जाणाऱ्या येणाऱ्या रेल्वे प्रवाशांना ,विद्यार्थ्यांना व सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे .याबाबत आपण खासदार बाळू धानोरकर यांच्याकडे तक्रार करणार असून रस्त्याची उपायोजना न केल्यास या विरोधात तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा घोडपेठ येथील काँग्रेस नेते अशोक येरगुडे यांनी दिला आहे.
या रस्त्यातून वाँशरीतून रेल्वे सायडीग वर कोळसा घेऊन येणाऱ्या अवजड ट्रकांची निरंतर वाहतूक सुरू असते. या अवजड वाहनांमुळे हा रस्ता जागोजागी उखडला असून त्यावर मोठ मोठे खड्डे पडलेले आहे .त्यामुळे हा रस्ता वाहतुकीस अयोग्य झाला आहे. सध्या पावसाचे दिवस सुरू असल्याने या रस्त्यावर खड्ड्यासोबतच चिखलांचे साम्राज्य पसरलेले आहे .या रस्त्यातून ताडाळी रेल्वेवर जाणारे प्रवासी, वसाहतीतील नागरिक, उमरी रिठावरील ग्रामस्थ व विद्यार्थी प्रवास करीत असतात त्यामुळे त्यांना त्रास होत आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असल्यामुळे येथे अपघाताची शक्यता ही वाढली आहे. या खराब रस्त्याला कोलवाँशरीच जबाबदार असल्याचा आरोप अशोक येरगुडे यांनी केला आहे .ही समस्या आपण चंद्रपूर क्षेत्राचे खासदारांकडे नेणार असल्याचे सांगून रस्त्याची उपाययोजना न केल्यास या विरोधात जनआंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

Comments