लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

निळकंठराव शिंदे महाविद्यालयातर्फे हर घर तिरंगा प्रभात फेरीचे आयोजन

निळकंठराव शिंदे महाविद्यालयातर्फे हर घर तिरंगा प्रभात फेरीचे आयोजन
.......................................

भद्रावती:- स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्रीय छात्र सेना व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयात आजादी का अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा या अभीयानाअर्तगत जागृतीपर  दिनांक 12 ऑगस्ट 2022 ला प्रभात फेरी काढण्यात आली
प्रभात फेरीला संबोधित करीत असताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एल एस लडके यांनी सांगितले की देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी क्रांतिकारकांनी दिलेला लढा व बलिदान तसेच देशांच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये युवकांचे योगदान व त्यांनी पार पाडावयाच्या जबाबदाऱ्या या विषयाचे विस्तृत प्रमाणात मार्गदर्शन केले
महाराष्ट्र पोलीस शाखा वरोरा च्या वतीने भद्रावती मध्ये आगमन केलेल्या बाईक रॅलीचे महाविद्यालयातर्फे स्वागत व अभिवादन करण्यात आले महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची प्रभात फेरी महाविद्यालयापासून ते नाग मंदिर पर्यंत  हातामध्ये तिरंगा ध्वज घेऊन स्वातंत्र्य दिनाच्या घोषणा देत व दिनांक 13 ,14 व 15 ऑगस्ट रोजी सर्वांनी हर घर तिरंगा या जनजागृती अभियानांतर्गत सर्वांनी आपापल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवावा यासाठी लोकांमध्ये जागृती करण्यात आली
या प्रभात फेरीमध्ये महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या  संखेने उपस्थित होते

Comments