1

प्रति  माननीय गटशिक्षण अधिकारी साहेब, पंचायत समिती वरोरा जिल्हा चंद्रपूर. विषय-अंशकालीन निदेशक नेमणूक करताना होत असलेल्या अन्यायाबाबत. अर्जदार- विशाखा विलास गुजर टिळकवाड वरोरा जिल्हा चंद्रपूर, संपर्क ९५७९७३४२२९.  महोदय. मी सौ विशाखा विलास गुजर (लुतडे) राहणार वरोरा. सध्या मी पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आनंदवन येथे सन २०१२ पासून २०१९ पर्यंत अंशकालीन निदेशक पदावर कार्यरत होते. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्फत गुणांकन व मुलाखत प्रक्रियेनंतर दिनांक १९/७/ २०२५ रोजी मला अंशकालीन कला निदेशक पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आले होते. या पदावर माझी मेरिट पद्धतीने निवड करण्यात आली होती.  मात्र एका महिन्याच्या आतच गटशिक्षण अधिकारी यांच्या आदेशान्वये केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्या सहीचे पत्र मला प्राप्त झाले ज्या द्वारे माझी नियुक्ती ७/८/२०२५ पासून रद्द करण्यात आल्याचे लेखी स्वरूपात कळविण्यात आले त्यामुळे मला मानसिक त्रास सहन करावा लागला . मी २०१६ पासून पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आनंदवन शाळेमध्ये कला निदेशक पदावर कार्यरत...

निळकंठराव शिंदे महाविद्यालयातर्फे हर घर तिरंगा प्रभात फेरीचे आयोजन

निळकंठराव शिंदे महाविद्यालयातर्फे हर घर तिरंगा प्रभात फेरीचे आयोजन
.......................................

भद्रावती:- स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्रीय छात्र सेना व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयात आजादी का अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा या अभीयानाअर्तगत जागृतीपर  दिनांक 12 ऑगस्ट 2022 ला प्रभात फेरी काढण्यात आली
प्रभात फेरीला संबोधित करीत असताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एल एस लडके यांनी सांगितले की देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी क्रांतिकारकांनी दिलेला लढा व बलिदान तसेच देशांच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये युवकांचे योगदान व त्यांनी पार पाडावयाच्या जबाबदाऱ्या या विषयाचे विस्तृत प्रमाणात मार्गदर्शन केले
महाराष्ट्र पोलीस शाखा वरोरा च्या वतीने भद्रावती मध्ये आगमन केलेल्या बाईक रॅलीचे महाविद्यालयातर्फे स्वागत व अभिवादन करण्यात आले महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची प्रभात फेरी महाविद्यालयापासून ते नाग मंदिर पर्यंत  हातामध्ये तिरंगा ध्वज घेऊन स्वातंत्र्य दिनाच्या घोषणा देत व दिनांक 13 ,14 व 15 ऑगस्ट रोजी सर्वांनी हर घर तिरंगा या जनजागृती अभियानांतर्गत सर्वांनी आपापल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवावा यासाठी लोकांमध्ये जागृती करण्यात आली
या प्रभात फेरीमध्ये महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या  संखेने उपस्थित होते

Comments