वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

तालुक्यातील ग्रामपंचायत संगणक परिचालकांचे काम बंद आंदोलन.थकित मानधन त्वरीत देण्याची मागणी.

तालुक्यातील ग्रामपंचायत संगणक परिचालकांचे काम बंद आंदोलन.
थकित मानधन त्वरीत देण्याची मागणी.

भद्रावती. 
रवि बघेल 
चार महिण्यांचे थकित असलेले मानधन अद्याप मिळाले नसल्याने तालुक्यातील ग्रामपंचायत अंतर्गत काम करीत असलेल्या संगणक परिचालकांवर उपासमारीची पाळी आली आहे,परीणामी जोपर्यंत हे थकित मानधन मिळत नाही तोपर्यंत या संगणक परिचालकांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनामुळे तालुक्यातील ग्रामपंचायतीचे कामकाज प्रभावित झाले आहे. हे थकित मानधन त्वरीत मिळावे यासाठी सदर महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या जिल्हा शाखेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनही सादर करण्यात आले आहे. तालुक्यातील ग्रामपंचायत अंतर्गत कार्य करणारे संगणक परिचालक हे शासनाच्या डिजिटल राज्य संकल्पनेतील प्रमुख दुवा आहे. अगदी तुटपुंज्या मानधनावर हे कर्मचारी आपली जबाबदारी सांभाळत आहे मात्र हे मानधनही त्यांना दर महिन्याला मिळत नसल्याने त्यांना जिवन जगने असह्य झाले आहे. त्यामुळे त्यांना नाईलाजाने आंदोलन सुरु करावे लागले.यापुर्वी निवेदन देण्या आले होते मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे संघटनेच्या मनीष बलकी यांनी सांगितले आहे.

Comments