लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

भद्रावती येथील डोलारा परिसरातील नागरिकांने अडविला महामार्ग.

भद्रावती येथील डोलारा परिसरातील नागरिकांने अडविला महामार्ग.

डोलारा तलावातील पाणी न वळवल्यास आंदोलनाचा इशारा.

रवि बघेल भद्रावती
26/7/22

गेल्या 15-20 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे भद्रावती येथील डोलारा तलाव पाण्याने भरला असून, घराघरात पाणी शिरल्याने शेजारी राहणाऱ्या लोक वस्ती मधील नागरिकांचे प्रचंड हाल झाले. याबाबत प्रशासनाने दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा डोलारा परिसरातील लोकांनी दिला आहे.


यासंदर्भात वारंवार न.प.ला माहिती देऊन सुद्धा काहीच मार्ग निघाला नाही. त्यामुळे या परिसरातील लोकांनी एकत्र जमा होत बुधवारी सकाळी या संदर्भात नगराध्यक्ष व तहसीलदारांना निवेदन देत महामार्ग अडवण्याचा प्रयत्न केला. अति पावसामुळे डोलारा तलावातील पाणी लोक वस्तीमध्ये शिरत असल्याने तेथील पाणी पंप द्वारे दुसऱ्या ठिकाणी वळविण्यात यावे अशी मागणी करीत लोकांनी तहसीलदार व नगराध्यक्ष केली होती.
परंतु प्रशासनाला जाग आली नाही त्यामुळे डोलारा येथील २००-२५० लोकांनी जमून तहसील कार्यालयात तहसीलदारांना घेराव करून निवेदन सादर केले , प्रशासनाने त्वरित समस्या न सोडवील्यास भव्य आंदोलन करण्याचा इशारा देत. कार्यालयासमोर घोषणाबाजी  देण्यात आल्या. यावेळी डोलारा परिसरातील बहुतांश कुटुंब उपस्थित होते.

परंतु प्रश्नाचे समाधान न मिळाल्याने डोलारा परिसरातील लोकांनी काही काळापुरता नागपूर चंद्रपूर महामार्गावर बसून आपला विरोध दर्शवत  आंदोलन सुरू केल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली होती .

यानंतर प्रशासनाने तत्परता दाखवत डोलारा परिसरातील पाणी वळवण्याचे काम सुरू करण्याचे आश्वासन देत महामार्गावरील बसलेल्या आंदोलकाना  पोलीस साच्या साह्याने बाजूला करण्यात आले.

Comments