1

प्रति  माननीय गटशिक्षण अधिकारी साहेब, पंचायत समिती वरोरा जिल्हा चंद्रपूर. विषय-अंशकालीन निदेशक नेमणूक करताना होत असलेल्या अन्यायाबाबत. अर्जदार- विशाखा विलास गुजर टिळकवाड वरोरा जिल्हा चंद्रपूर, संपर्क ९५७९७३४२२९.  महोदय. मी सौ विशाखा विलास गुजर (लुतडे) राहणार वरोरा. सध्या मी पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आनंदवन येथे सन २०१२ पासून २०१९ पर्यंत अंशकालीन निदेशक पदावर कार्यरत होते. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्फत गुणांकन व मुलाखत प्रक्रियेनंतर दिनांक १९/७/ २०२५ रोजी मला अंशकालीन कला निदेशक पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आले होते. या पदावर माझी मेरिट पद्धतीने निवड करण्यात आली होती.  मात्र एका महिन्याच्या आतच गटशिक्षण अधिकारी यांच्या आदेशान्वये केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्या सहीचे पत्र मला प्राप्त झाले ज्या द्वारे माझी नियुक्ती ७/८/२०२५ पासून रद्द करण्यात आल्याचे लेखी स्वरूपात कळविण्यात आले त्यामुळे मला मानसिक त्रास सहन करावा लागला . मी २०१६ पासून पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आनंदवन शाळेमध्ये कला निदेशक पदावर कार्यरत...

भद्रावती येथील डोलारा परिसरातील नागरिकांने अडविला महामार्ग.

भद्रावती येथील डोलारा परिसरातील नागरिकांने अडविला महामार्ग.

डोलारा तलावातील पाणी न वळवल्यास आंदोलनाचा इशारा.

रवि बघेल भद्रावती
26/7/22

गेल्या 15-20 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे भद्रावती येथील डोलारा तलाव पाण्याने भरला असून, घराघरात पाणी शिरल्याने शेजारी राहणाऱ्या लोक वस्ती मधील नागरिकांचे प्रचंड हाल झाले. याबाबत प्रशासनाने दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा डोलारा परिसरातील लोकांनी दिला आहे.


यासंदर्भात वारंवार न.प.ला माहिती देऊन सुद्धा काहीच मार्ग निघाला नाही. त्यामुळे या परिसरातील लोकांनी एकत्र जमा होत बुधवारी सकाळी या संदर्भात नगराध्यक्ष व तहसीलदारांना निवेदन देत महामार्ग अडवण्याचा प्रयत्न केला. अति पावसामुळे डोलारा तलावातील पाणी लोक वस्तीमध्ये शिरत असल्याने तेथील पाणी पंप द्वारे दुसऱ्या ठिकाणी वळविण्यात यावे अशी मागणी करीत लोकांनी तहसीलदार व नगराध्यक्ष केली होती.
परंतु प्रशासनाला जाग आली नाही त्यामुळे डोलारा येथील २००-२५० लोकांनी जमून तहसील कार्यालयात तहसीलदारांना घेराव करून निवेदन सादर केले , प्रशासनाने त्वरित समस्या न सोडवील्यास भव्य आंदोलन करण्याचा इशारा देत. कार्यालयासमोर घोषणाबाजी  देण्यात आल्या. यावेळी डोलारा परिसरातील बहुतांश कुटुंब उपस्थित होते.

परंतु प्रश्नाचे समाधान न मिळाल्याने डोलारा परिसरातील लोकांनी काही काळापुरता नागपूर चंद्रपूर महामार्गावर बसून आपला विरोध दर्शवत  आंदोलन सुरू केल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली होती .

यानंतर प्रशासनाने तत्परता दाखवत डोलारा परिसरातील पाणी वळवण्याचे काम सुरू करण्याचे आश्वासन देत महामार्गावरील बसलेल्या आंदोलकाना  पोलीस साच्या साह्याने बाजूला करण्यात आले.

Comments