1

प्रति  माननीय गटशिक्षण अधिकारी साहेब, पंचायत समिती वरोरा जिल्हा चंद्रपूर. विषय-अंशकालीन निदेशक नेमणूक करताना होत असलेल्या अन्यायाबाबत. अर्जदार- विशाखा विलास गुजर टिळकवाड वरोरा जिल्हा चंद्रपूर, संपर्क ९५७९७३४२२९.  महोदय. मी सौ विशाखा विलास गुजर (लुतडे) राहणार वरोरा. सध्या मी पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आनंदवन येथे सन २०१२ पासून २०१९ पर्यंत अंशकालीन निदेशक पदावर कार्यरत होते. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्फत गुणांकन व मुलाखत प्रक्रियेनंतर दिनांक १९/७/ २०२५ रोजी मला अंशकालीन कला निदेशक पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आले होते. या पदावर माझी मेरिट पद्धतीने निवड करण्यात आली होती.  मात्र एका महिन्याच्या आतच गटशिक्षण अधिकारी यांच्या आदेशान्वये केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्या सहीचे पत्र मला प्राप्त झाले ज्या द्वारे माझी नियुक्ती ७/८/२०२५ पासून रद्द करण्यात आल्याचे लेखी स्वरूपात कळविण्यात आले त्यामुळे मला मानसिक त्रास सहन करावा लागला . मी २०१६ पासून पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आनंदवन शाळेमध्ये कला निदेशक पदावर कार्यरत...

भद्रावती रेल्वेस्थानकावर सुपरफास्ट गाड्यांचा थांबा सुरू करावा.भद्रावती रेल्वे स्थानकावर नागरिकांचे हाल

भद्रावती रेल्वेस्थानकावर सुपरफास्ट गाड्यांचा थांबा सुरू करावा.

भद्रावती रेल्वे स्थानकावर नागरिकांचे हाल

भद्रावती15/5/22
रवी बघेल


चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती हे ऐतिहासिक शहर असून या स्थानकावरून नागपूर व मुंबईला जाण्यासाठी एकही रेल्वे थांबा नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती हे तालुक्याचे ठिकाण असून या ठिकाणी जैन समाजाचे भव्य मंदिर , पुरातन गणपती मंदिर व नाग मंदिर तसेच बौद्ध लेणीसाठी प्रसिद्ध आहे. भद्रावती हे तालुक्याचे ठिकाण असून या ठिकाणी मोठे उद्योग, डब्ल्यूसीएल, व ऑर्डनन्स फॅक्टरी असल्याने भारतातील बरेच प्रवासी या ठिकाणी येत असतात.

या स्थानकावर प्रवाशांसाठी पिण्याचे पाणी, पार्किंग, लाईट आदी मूलभूत सुविधा नाहीत.
भद्रावतीमध्ये कोरोनापूर्वी नागपूरमार्गे दिल्लीला जाण्यासाठी दक्षिण एक्सप्रेसचा थांबा होता. पण कोरोनामध्ये थांबा बंद झाला. कोरोना संपल्यानंतरही दक्षिण एक्सप्रेसचा थांबा पूर्ववत करण्याची मागणी जनतेकडून होत आहे . 
डब्ल्यूसीएल आणि ओएफसीमध्ये बिहारी कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असल्याने या लोकांना परराज्यात जाण्यासाठी खूप त्रास होतो, त्यामुळे पाटणा एक्स्, UP, DN ट्रेन थांबवण्याची मागणी होत आहे. 

भद्रावती येथील प्रवासी चंद्रपूरला उतरून
भद्रावतीला  बस रस्त्याने यावे लागते. त्यामुळे राजस्थान, गुजरात, दिल्ली मधून मोठ्या प्रमाणात येणारे भावीक जैन बांधवची गैरसोय होत आहे.
त्यामुळे रेल्वे प्रशासनाने भद्रावती शहरातील रेल्वे स्थानकावर सुपरफास्ट रेल्वे गाड्यांचा थांबा सुरु करावा अशी मागणी सर्व स्तरावरून होत आहे.
या मागणीकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन यासंदर्भात पाठपुरावा करण्याची गरज असल्याचे मत भद्रावती करांनी व्यक्त केले.

Comments