लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

भद्रावती रेल्वेस्थानकावर सुपरफास्ट गाड्यांचा थांबा सुरू करावा.भद्रावती रेल्वे स्थानकावर नागरिकांचे हाल

भद्रावती रेल्वेस्थानकावर सुपरफास्ट गाड्यांचा थांबा सुरू करावा.

भद्रावती रेल्वे स्थानकावर नागरिकांचे हाल

भद्रावती15/5/22
रवी बघेल


चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती हे ऐतिहासिक शहर असून या स्थानकावरून नागपूर व मुंबईला जाण्यासाठी एकही रेल्वे थांबा नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती हे तालुक्याचे ठिकाण असून या ठिकाणी जैन समाजाचे भव्य मंदिर , पुरातन गणपती मंदिर व नाग मंदिर तसेच बौद्ध लेणीसाठी प्रसिद्ध आहे. भद्रावती हे तालुक्याचे ठिकाण असून या ठिकाणी मोठे उद्योग, डब्ल्यूसीएल, व ऑर्डनन्स फॅक्टरी असल्याने भारतातील बरेच प्रवासी या ठिकाणी येत असतात.

या स्थानकावर प्रवाशांसाठी पिण्याचे पाणी, पार्किंग, लाईट आदी मूलभूत सुविधा नाहीत.
भद्रावतीमध्ये कोरोनापूर्वी नागपूरमार्गे दिल्लीला जाण्यासाठी दक्षिण एक्सप्रेसचा थांबा होता. पण कोरोनामध्ये थांबा बंद झाला. कोरोना संपल्यानंतरही दक्षिण एक्सप्रेसचा थांबा पूर्ववत करण्याची मागणी जनतेकडून होत आहे . 
डब्ल्यूसीएल आणि ओएफसीमध्ये बिहारी कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असल्याने या लोकांना परराज्यात जाण्यासाठी खूप त्रास होतो, त्यामुळे पाटणा एक्स्, UP, DN ट्रेन थांबवण्याची मागणी होत आहे. 

भद्रावती येथील प्रवासी चंद्रपूरला उतरून
भद्रावतीला  बस रस्त्याने यावे लागते. त्यामुळे राजस्थान, गुजरात, दिल्ली मधून मोठ्या प्रमाणात येणारे भावीक जैन बांधवची गैरसोय होत आहे.
त्यामुळे रेल्वे प्रशासनाने भद्रावती शहरातील रेल्वे स्थानकावर सुपरफास्ट रेल्वे गाड्यांचा थांबा सुरु करावा अशी मागणी सर्व स्तरावरून होत आहे.
या मागणीकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन यासंदर्भात पाठपुरावा करण्याची गरज असल्याचे मत भद्रावती करांनी व्यक्त केले.

Comments