वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

ऑडिओ क्लिप व्हायरल करून शिवसेनेचे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न.

ऑडिओ क्लिप व्हायरल करून शिवसेनेचे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न.

चार महिन्यापासून सुरू होते आंदोलन.

वरोरा 12/5/22
चेतन लूतडे

मागील चार महिन्यापासून बिएस इस्पात कंपनी विरोधात शिवसेनेच्या नेतृत्वात मजरा, सालोरी येन्सा ब्लॉक मधील लोकांनी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाच्या प्रशासकीय स्तरावर सातत्याने बैठकी सुरू आहे परंतु अजून पर्यंत कोणताच मार्ग निघालेला नाही.

यादरम्यान बिएस इस्पात कंपनीचे कातंगळे यांनी जेठाणी यांच्यावर ठेका मागीतल्यासंदर्भात तसेच ग्रामपंचायत सदस्य हर्षल निब्रड यांच्यावर खंडणी व ठेका मागीतल्यासंदर्भात तक्रार दाखल केलेली आहे.

त्यामुळे शिवसैनिक व गावकरी यांनी  वरोरा शिवसेना कार्यालयात कंपनीचा निषेध करत. कंपनीने माफी मागावी अशी मागणी केली आहे. यासंदर्भात मनिष जेठणी यांनी कंपनीचे एच आर कातंगळे , पत्रकार , सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध मानहाणीची तक्रार वरोरा पोलिसात दाखल केली आहे.

या प्रकरणात गावकऱ्यांच्या रोजगार संबंधी काही मागण्या होत्या. शेतकऱ्यांच्या पानदन रस्त्याची दुरुस्ती, धुळीमुळे शेतकऱ्याचे होनारे नुकसान, ग्रामपंचायतीचा अंदाजे 13लाख रू थकीत कर, कंपनी सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतची लागणारी एन ओ सी, प्रदूषण विभागाच्या क्लिअरन्स सर्टिफिकेट , जे कर्मचारी काम करत आहे त्यांच्या पीएफ संदर्भातील प्रश्न,या सगळ्या बाबी वर कंपनी बोलायला तयार नाही. त्यामुळे या कंपनीमध्ये वारंवार गावकरी आंदोलना मार्फत आपल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु अजून पर्यंत कोणताही मार्ग प्रशासकीय स्तरावर निघालेल्या नाही. त्यामुळे हा वाद बऱ्याच दिवसापासून चिघळत आहे. तर दुसरीकडे कंपनीने दुसरे मजदूर आणून कंपनी सुरू करून स्थानिक रोजगारांना डावल्यामुळे हि स्थिती निर्माण झाली आहे.

शिवसेना आणि कंपनी यांच्या वादात प्रशासन काय भूमिका घेते याकडे आता गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.


Comments