वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

महाराष्ट्र दिनी ग्रामीण भागातील बस सेवा सुरळीत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जनतेने मानले आभार

महाराष्ट्र दिनी ग्रामीण भागातील बस सेवा सुरळीत
निवेदनाचा पाठपुरावा करून   ग्रामीण भागासाठी बस सेवा सुरू केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे ग्रामीण भागातील जनतेने मानले आभार


चेतन लूतडे
1/5/22
महाराष्ट्र सरकारचा बस कर्मचाऱ्यांचा संप संपल्यानंतर शहरी भागातील बस सेवा सुरू करण्यात आली. मात्र ग्रामीण क्षेत्रातील लालपरी अजूनही बंद पडली आहे. याचा फटका सर्वसाधारण ग्रामीण जनतेला बसत असून उन्हाळ्यात जास्त तापमानामुळे ग्रामीण भागातील जनतेला पायपीट करावी लागत आहे.
यासंदर्भात राष्ट्रवादीचे कॉंग्रेस पक्षाचे भद्रावती तालुकाध्यक्ष सुधाकर रोहणकर यांनी वरोरा बस आगाराला निवेदन सादर केले होते ‌.

यासंदर्भात पाठपुरावा केल्यानंतर तर राष्ट्रवादी संघटनेच्या नेत्यांनी ग्रामीण भागातील वरोरा ते सावरी व वरोरा ते मूधोली ही बस सेवा तात्काळ सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला याचा फायदा मिळणार आहे. बऱ्याच भागातील बस सेवा विस्कळीत झाले असून येणाऱ्या दिवसात ही सेवा सुरळीत करण्याचे आश्वासन आगार प्रमुखांनी यांनी दिले.
यावेळी बस सेवा सुरू करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे विलास नेरकर व सुधाकर रोहणकर यांनी अथक प्रयत्न केले. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेने त्यांचे आभार व्यक्त केले आहे.

Comments