1

प्रति  माननीय गटशिक्षण अधिकारी साहेब, पंचायत समिती वरोरा जिल्हा चंद्रपूर. विषय-अंशकालीन निदेशक नेमणूक करताना होत असलेल्या अन्यायाबाबत. अर्जदार- विशाखा विलास गुजर टिळकवाड वरोरा जिल्हा चंद्रपूर, संपर्क ९५७९७३४२२९.  महोदय. मी सौ विशाखा विलास गुजर (लुतडे) राहणार वरोरा. सध्या मी पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आनंदवन येथे सन २०१२ पासून २०१९ पर्यंत अंशकालीन निदेशक पदावर कार्यरत होते. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्फत गुणांकन व मुलाखत प्रक्रियेनंतर दिनांक १९/७/ २०२५ रोजी मला अंशकालीन कला निदेशक पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आले होते. या पदावर माझी मेरिट पद्धतीने निवड करण्यात आली होती.  मात्र एका महिन्याच्या आतच गटशिक्षण अधिकारी यांच्या आदेशान्वये केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्या सहीचे पत्र मला प्राप्त झाले ज्या द्वारे माझी नियुक्ती ७/८/२०२५ पासून रद्द करण्यात आल्याचे लेखी स्वरूपात कळविण्यात आले त्यामुळे मला मानसिक त्रास सहन करावा लागला . मी २०१६ पासून पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आनंदवन शाळेमध्ये कला निदेशक पदावर कार्यरत...

महाराष्ट्र दिनी ग्रामीण भागातील बस सेवा सुरळीत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जनतेने मानले आभार

महाराष्ट्र दिनी ग्रामीण भागातील बस सेवा सुरळीत
निवेदनाचा पाठपुरावा करून   ग्रामीण भागासाठी बस सेवा सुरू केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे ग्रामीण भागातील जनतेने मानले आभार


चेतन लूतडे
1/5/22
महाराष्ट्र सरकारचा बस कर्मचाऱ्यांचा संप संपल्यानंतर शहरी भागातील बस सेवा सुरू करण्यात आली. मात्र ग्रामीण क्षेत्रातील लालपरी अजूनही बंद पडली आहे. याचा फटका सर्वसाधारण ग्रामीण जनतेला बसत असून उन्हाळ्यात जास्त तापमानामुळे ग्रामीण भागातील जनतेला पायपीट करावी लागत आहे.
यासंदर्भात राष्ट्रवादीचे कॉंग्रेस पक्षाचे भद्रावती तालुकाध्यक्ष सुधाकर रोहणकर यांनी वरोरा बस आगाराला निवेदन सादर केले होते ‌.

यासंदर्भात पाठपुरावा केल्यानंतर तर राष्ट्रवादी संघटनेच्या नेत्यांनी ग्रामीण भागातील वरोरा ते सावरी व वरोरा ते मूधोली ही बस सेवा तात्काळ सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला याचा फायदा मिळणार आहे. बऱ्याच भागातील बस सेवा विस्कळीत झाले असून येणाऱ्या दिवसात ही सेवा सुरळीत करण्याचे आश्वासन आगार प्रमुखांनी यांनी दिले.
यावेळी बस सेवा सुरू करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे विलास नेरकर व सुधाकर रोहणकर यांनी अथक प्रयत्न केले. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेने त्यांचे आभार व्यक्त केले आहे.

Comments