लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

खासदार, आमदार धानोरकर दाम्पत्याचा हस्ते प्रदूषण विरहित दुचाकी वाहन दुकानाचे उदघाटन

*प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवावा*

*खासदार, आमदार धानोरकर दाम्पत्याचा हस्ते प्रदूषण विरहित दुचाकी वाहन दुकानाचे उदघाटन*

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा हा प्रदूषित जिल्हा म्हणून ओळखला जातो. मोठ्या प्रमाणात उद्योग व्यवसायाच्या प्रदूषणासोबतच खासगी वाहनांमुळे देखील मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण होत आहे. त्यामुळे येत्या काळात चंद्रपूर जिल्ह्यात प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्याचे आवाहन खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले आहे. याप्रसंगी जेष्ठ नेते प्रकाश भाऊ मुथा यांची विशेष उपस्थिती होती. 

ते चंद्रपूर येथील पी. व्ही. एस इंटरप्रायजेस इलेक्ट्रिक वाहनांच्या दुकानाचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. 

याप्रसंगी काँग्रेस महासचिव विनोद दत्तात्रय, काँग्रेस शहर अध्यक्ष रामू तिवारी, जेष्ठ काँग्रेस नेते विनोद अहिरकर, डॉ. चेतन खुटेमाटे, प्रा. विजय बदखल, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, माजी नगरसेवक पिंटू शिरवार, रामदास भिसडे, कुणाल चहारे यांची उपस्थिती होती. 

पुढे बोलताना आमदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाले कि, मागील काही वर्षात इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात मोठा विकास होत आहे. या वाहनांचा नागरिकांनी अधिकाधिक वापर करावा यासाठी ईव्ही धोरणाच्या माध्यमातून शासन विविध उपाययोजना करीत आहे. प्रदूषण कमी करण्यावरही भर देण्यात येत आहे. सर्वच शहरांमधून या वाहनांसाठी चांगला प्रतिसाद मिळत असून, चंद्रपूर शहरात देखील या वाहनाच्या वापर करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. याप्रसंगी अन्य मान्यवरांनी देखील आपली मते व्यक्त केली.

Comments