1

प्रति  माननीय गटशिक्षण अधिकारी साहेब, पंचायत समिती वरोरा जिल्हा चंद्रपूर. विषय-अंशकालीन निदेशक नेमणूक करताना होत असलेल्या अन्यायाबाबत. अर्जदार- विशाखा विलास गुजर टिळकवाड वरोरा जिल्हा चंद्रपूर, संपर्क ९५७९७३४२२९.  महोदय. मी सौ विशाखा विलास गुजर (लुतडे) राहणार वरोरा. सध्या मी पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आनंदवन येथे सन २०१२ पासून २०१९ पर्यंत अंशकालीन निदेशक पदावर कार्यरत होते. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्फत गुणांकन व मुलाखत प्रक्रियेनंतर दिनांक १९/७/ २०२५ रोजी मला अंशकालीन कला निदेशक पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आले होते. या पदावर माझी मेरिट पद्धतीने निवड करण्यात आली होती.  मात्र एका महिन्याच्या आतच गटशिक्षण अधिकारी यांच्या आदेशान्वये केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्या सहीचे पत्र मला प्राप्त झाले ज्या द्वारे माझी नियुक्ती ७/८/२०२५ पासून रद्द करण्यात आल्याचे लेखी स्वरूपात कळविण्यात आले त्यामुळे मला मानसिक त्रास सहन करावा लागला . मी २०१६ पासून पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आनंदवन शाळेमध्ये कला निदेशक पदावर कार्यरत...

माजी मंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते जेनेरिक औषधाच्या दुकानाचे उद्घाटन

माजी मंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते जेनेरिक औषधाच्या दुकानाचे उद्घाटन

वरोरा
चेतन लूतडे

वरोरा शहरात प्रधानमंत्री जन औषध योजनेच्या मार्फत गांधी उद्यान बगिच्या समोर जन्नत जेनेरिक औषधाच्या दुकानाचे  उद्घाटन करण्यात आले.

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जन औषधि योजनेमार्फत वरोरा शहराच्या मध्यभागात जन्नत जेनेरिक औषधि केंद्र उभारण्यात आले असून याचे उद्घाटन भाजपा चे माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी उद्घाटन केले. यावेळी ते केंद्र सरकारची महत्वकांक्षी योजनेबद्दल बोलत होते. सर्वसामान्यांना या औषधी चा मोठ्या प्रमाणात फायदा होणार असून डॉक्टरच्या सल्ल्याने या औषधाचा वापर करावा जेणेकरून सर्वसामान्य व्यक्तीला कमी दरात चांगल्या प्रतीचे औषधी प्राप्त होईल. या औषधी गुणवत्ता प्राप्त असून कोणाचीही पेटंट नसलेले औषध असल्याने सर्वसामान्य व्यक्तीला 80 टक्के पर्यंत कमी किमतीत जेनेरिक औषध प्राप्त होऊ शकते. त्यामुळे कोणीही याचा अपप्रचार करू नये . असे मत माजी मंत्री हंसराज अहिर यांनी व्यक्त केले.

परंतु भारतात जेनेरिक औषधालय सुरू झाले असून आज पर्यंत ही औषधे लिहून देणारे डॉक्टर्स किंवा तत्सम यंत्रणा कोणत्याही शहरात नसल्याने गरीब लोकांपर्यंत ही औषधे पोहोचू शकली नाही. अशी खंत गरीब लोकांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात विचारणा केली असता लवकरच सरकार या संदर्भात पाऊल उचलेल अशी सकारात्मक भूमिका मंत्र्यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमासाठी माजी केंद्रीय राज्य गृहमंत्री हंसराज अहिर, सोबत माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली, बाबा बागडे, ओम मांडवकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

Comments