वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

माजी मंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते जेनेरिक औषधाच्या दुकानाचे उद्घाटन

माजी मंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते जेनेरिक औषधाच्या दुकानाचे उद्घाटन

वरोरा
चेतन लूतडे

वरोरा शहरात प्रधानमंत्री जन औषध योजनेच्या मार्फत गांधी उद्यान बगिच्या समोर जन्नत जेनेरिक औषधाच्या दुकानाचे  उद्घाटन करण्यात आले.

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जन औषधि योजनेमार्फत वरोरा शहराच्या मध्यभागात जन्नत जेनेरिक औषधि केंद्र उभारण्यात आले असून याचे उद्घाटन भाजपा चे माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी उद्घाटन केले. यावेळी ते केंद्र सरकारची महत्वकांक्षी योजनेबद्दल बोलत होते. सर्वसामान्यांना या औषधी चा मोठ्या प्रमाणात फायदा होणार असून डॉक्टरच्या सल्ल्याने या औषधाचा वापर करावा जेणेकरून सर्वसामान्य व्यक्तीला कमी दरात चांगल्या प्रतीचे औषधी प्राप्त होईल. या औषधी गुणवत्ता प्राप्त असून कोणाचीही पेटंट नसलेले औषध असल्याने सर्वसामान्य व्यक्तीला 80 टक्के पर्यंत कमी किमतीत जेनेरिक औषध प्राप्त होऊ शकते. त्यामुळे कोणीही याचा अपप्रचार करू नये . असे मत माजी मंत्री हंसराज अहिर यांनी व्यक्त केले.

परंतु भारतात जेनेरिक औषधालय सुरू झाले असून आज पर्यंत ही औषधे लिहून देणारे डॉक्टर्स किंवा तत्सम यंत्रणा कोणत्याही शहरात नसल्याने गरीब लोकांपर्यंत ही औषधे पोहोचू शकली नाही. अशी खंत गरीब लोकांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात विचारणा केली असता लवकरच सरकार या संदर्भात पाऊल उचलेल अशी सकारात्मक भूमिका मंत्र्यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमासाठी माजी केंद्रीय राज्य गृहमंत्री हंसराज अहिर, सोबत माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली, बाबा बागडे, ओम मांडवकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

Comments