वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे उपविभाग वरोरा येथे नव्याने सुरू करावे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रमेश मेश्राम

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे उपविभाग वरोरा येथे नव्याने सुरू करावे

आदिवासी बांधवांच्या योजना चांगल्या रीतीने राबविण्यासाठी वरोरा येथे उपविभागीय कार्यालय सुरू करावे

शिवसेना उपजिल्हाप्रमुख रमेश मेश्राम यांची पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना मागणी.

वरोरा
चेतन लूतडे

शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा आदिवासी समाजाचे नेते रमेश मेश्राम यांनी पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे आदिवासी बांधवासाठी वरोरा येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे उपकार्यालय वरोरा येथे नव्याने सुरू करण्याबाबत निवेदन देऊन लवकरात लवकर सुरू करण्याचा आग्रह धरला आहे.

वरोरा भद्रावती तालुक्यातील 300 गावामध्ये जवळपास 30 ते 40 हजार आदिवासी समाजातील लोकसंख्या असून आदिवासी समाजातील योजनेचा लाभ घेण्यासाठी गेल्या कित्येक वर्षापासून चिमूर येथे पायपीट करावी लागत आहे. वरोरा भद्रावती तालुक्याच्या ठिकाणावरुन चिमूर गावाचे अंतर 70 ते 80 किलो मीटर दूर असल्याने महाराष्ट्र शासन राबवित असलेल्या योजनेची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही. तालुक्यातील आदिवासी बांधवांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने ते वारंवार चिमूर प्रकल्प कार्यालयात येणे-जाणे करू शकत नाही. त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान व वेळ वाया जात आहे. त्यामुळे आदिवसि समाजा करिता महाराष्ट्र शासन राबवित असलेल्या विविध योजनेपासून आदिवासी बांधव वंचित राहत आहेत.
या समस्येची जाणीव ठेवून आदिवासी नेते रमेश मेश्राम यांनी आदित्य ठाकरे पर्यावरण व पर्यटन मंत्री यांच्याकडे एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय वरोरा येथील नव्याने उघडण्याबाबत चर्चा केली असून त्या संदर्भात निवेदन सादर केले आहे. 13 तारखेला पर्यावरण व पर्यटन मंत्रीआदित्य ठाकरे हे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना वरोरा येथे निवेदन देण्यात आले.ठाकरे सरकारने याबाबत मेश्राम यांना शब्द दिला असून येणाऱ्या काळात  आदिवासी मंत्री के सी पाडवी यांच्याशी सल्लामसलत करून लवकरात लवकर उपकार्यालय वरोरा येथे सुरू करण्यात येण्याची ग्वाही दिली.

Comments